शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ग्रामपंचायत सदस्यासह नागरिकांचा बीडीओंच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

गोपाल डाहाके। मोर्शी : तालुक्यातील अंबाडा गावाला कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायतीतर्फे येथील विविध कामांत दिरंगाई होत ...

गोपाल डाहाके।

मोर्शी : तालुक्यातील अंबाडा गावाला कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायतीतर्फे येथील विविध कामांत दिरंगाई होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य प्रीतम माणिकराव खेरडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात विविध मागण्यांकरिता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी धरणे आंदोलन केले.

अंबाडा येथील अपंग बांधवांना ५ टक्के दिव्यांग निधी ग्रामपंचायत स्तरावर सन २०२०-२१ मध्ये अखर्चित रकमेचा तत्काळ अनुशेष भरून काढून दिव्यांगांना लाभ द्यावा, सन २०२०-२१ करिता शासन निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड करावी; वाॅर्ड क्रमांक एकच्या सभागृहाचे १४ वित्त आयोगातून नियमानुसार टेंडर प्रक्रिया पूर्ण करून व कार्यारंभ आदेश देऊन तत्काळ काम सुरू करावे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत मंजूर कामाचे लोकेशनबाबत ग्रामसभेत चर्चा करून बदली प्रस्ताव तत्काळ सादर करावा, घरकुल ‘ड‘ यादीतील लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने शासन निर्णयानुसार व निष्कर्षानुसार उचित कारवाई करावी व गरजू लाभार्थ्यांना यात प्राधान्य द्यावे, ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक त्रुटी व वितरण व्यवस्थेत योग्य ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार यांना देण्यात आले.

मागण्यांची तत्काळ दखल घेऊन येथील गटविकास अधिकारी यांनी अंबाडा येथील ग्रामसेवक धनंजय मोहोड यांना सूचना देऊन त्यांच्याकडून सर्व कामांचे तत्काळ निवारण होईल, असे लेखी लिहून घेतले. येत्या आठ दिवसांत विविध कामांची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी लेखी जबाबात म्हटले आहे.

या आंदोलनात अंबाडा ग्रामपंचायतचे सदस्य प्रीतम खेरडे, प्रवीण चांडक, सागर फाटे, उमेश काकडे, हर्षल भोजने, त्र्यंबक अंबाडकर, मुकेश कानफडे, किरण लोणारे, छोटू भेले, सुभाष आंबेडकर, राजू कोकरे, अनिल चढोकर, वृंदा टेकाम, प्रशांत खोब्रागडे, सुमित माहुरे, अतुल कुडवे, मधुकर वानखडे व ग्रामस्थ उपस्थित होते.