शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नागरिकांचा लसीकरणात उत्साह कमी, आतापर्यंत गाठले २२ टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST

संसर्ग माघारल्याने नागरिक बिनधास्त, दुसऱ्या लाटेत केंद्रांवर लागायच्या पहाटे ४ पासून रांगा अमरावती : शहरातील कोरोना संसर्गाचा ग्राफ माघारल्याने ...

संसर्ग माघारल्याने नागरिक बिनधास्त, दुसऱ्या लाटेत केंद्रांवर लागायच्या पहाटे ४ पासून रांगा

अमरावती : शहरातील कोरोना संसर्गाचा ग्राफ माघारल्याने अलीकडे रुग्णसंख्या घटली आहे व याचा थेट परिणाम लसीकरणावर होत आहे. दुसऱ्या लाटेत दररोज हजारांवर संक्रमितांची नोंद होत असताना लसीकरण केंद्रांवर पहाटे ४ पासून रांगा लागायच्या. केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण झाले आहे. आता संसर्ग कमी झाल्याने नागरिक बिनधास्त झाले व केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची साखळी ब्रेक करायची असेल, तर त्रिसूत्रीच्या पालनासह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन महत्त्वाचे आहे. यात कोरोना लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. याद्वारे समाजात सामूहिक रोग प्रतिकारक शक्ती तयार होऊन कोरोना नियंत्रणात आणता येतो. शहरात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्करच्या लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर व तीन टप्प्यांत आता सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस मोफतमध्ये देण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत १,८३,८१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत टक्केवारी २२ आहे. यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ६० हजारांच्या सुमारास आहे. ही टक्केवारी ७.५ आहे. आता लसींचा मुबलक पुरवठा होणार असल्याने लसीकरणाचा टक्का वाढणार असल्याचे डाॅ. विशाल काळे यांनी सांगितले.

पाईंटर

शहरात सर्वात जास्त लसीकरण झालेली केंद्रे

पीडीएमएमसी : २४,०५०

डेंटल कॉलेज : १८,०३०

आयसोलेशन : १७,३४५

दस्तुरनगर : १०,५८४

शहरात सर्वांत कमी लसीकरण झालेली केंद्रे

नागपुरी गेट : ५,४४५

सबनिस प्लॉट : ४,३६१

विलासनगर : ३,६४९

बिच्छु टेकडी : ३,३१०

बॉक्स

लसीकरण कमी होण्याची कारणे

संसर्गत कमी आल्याने कोरोनाचे भय कमी झाले. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे पहिला डोसनंतर दुसऱ्या डोससाठीचा कालावधी वाढला आहे. याशिवाय किमान तीन आठवड्यांपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण बंद आहे. त्यामुळे लसीकरणात आता घटले आहे.

कोट

लसीकरण सातत्याने सुरू आहे. काही केंद्रे उशिराने सुरु झाल्याने तेथील संख्या कमी दिसते. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद असल्याने थोडा टक्का माघारला. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

बॉक्स

टक्का वाढण्यासाठी पुरवठ्यात सातत्य हवे

१) लसीचा पुरवठा तोकडा व सातत्य नसल्याने काही केंद्रे बंद राहतात किंवा पुरवठ्यानुसार नियोजन केले जाते. त्यावेळी दुसरा डोस त्यातही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले.

२) कोविशिल्डचा पुरवठा जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे बहुतांश केंद्रांवर याच लसीचा वापर होत आहे. त्यात आता आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केले असल्याने दुसऱ्या डोजसाठी कालावधी बराच आहे.

३) शहरात एप्रिल महिन्यापासून लसीकरणाला मोठी गर्दी झाल्याने काही केंद्रे नव्याने सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्या केंद्रावरील लसीकरण कमी दिसत आहे.

४) तीन आठवड्यांपासून १८ ते ४४ वयोगटातील युवांचे लसीकरण बंद आहे. याशिवाय शहरातील काही नागरिकांनी ग्रामीण भागात जाऊन लसीकरण केले आहे. त्यामुळेही काही प्रमाणात घट झाली आहे.