शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा काठावरील नागरिक भयग्रस्तच

By admin | Updated: July 29, 2016 00:24 IST

दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून

दोन वर्षांपूर्वीचा प्रलय : उद्ध्वस्त घरे अद्यापही तशीच, नागरिकांना सतावते पुराची भीती विलास खाजोने ब्राम्हणवाडा थडी दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून शासनाच्या दुर्लक्षामुळे मोडलेल्या झोपड्यांमध्ये भयकंप स्थितीत अनेक नागरिक जीवन जगत आहे. दोन वर्षांपूर्वी २७ जुलै २०१४ ला पूर्णा एकट्या ब्राम्हणवाडा थडी येथील १७१ कुटुंबांतील ८५५ सदस्यांना या पुराचा फटका बसला. काही लोकांचे पूर्णत: तर काहींचे अंशत: घराचे नुकसान झाले. तात्पुरती मलमपट्टी म्हणून तहसील कार्यालयाच्यावतीने या १७१ कुटुंबांना खाण्यापिण्यासाठी निधी दिला. सामाजिक जाणिवेतून काही सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना मदत केली. याकाळात काही राजकीय नेत्यांनी त्या काळात या ठिकाणी येऊन मोठमोठी आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात या पूरग्रस्तांचे पूनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले अजूनपर्यंत न उचलल्याने दोन वर्षे उलटूनही पूरग्रस्त कुटुंबे चंद्रमौळी झोपड्यांमध्ये भयग्रस्त स्थितीत जीवन जगत आहेत. या १७१ कुटुंबांपैकी १०० कुटुंबांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनायांना त्यांनी ५ आॅगस्टला निवेदन देऊनही शासनाने याची दखल न घेतल्याने असे जीणे जगावे लागत असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे. पूर ओसरल्यानंतर तातडीने ग्रामसभा घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असा ठरावा ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी पुढे कारवाई केली नाही. आम्ही पूरग्रस्तांच्या बाजूने आहोत. गरज भासल्यास नागरिकांसाठी पुन्हा शासनस्तरावर प्रयत्न करू. - नंदकिशोर वासनकर, सरपंच, ब्राम्हणवाडा थडी मी म्हातारा असून माझेकडून कोणतेही कामधंदा होत नसल्याने मी शासनाचे श्रावणबाळ योजनेवर जगत आहे. पूर्णेच्या पुरात घर वाहून गेल्याने मला राहायची सोय नाही. मी नातेवाईकांकडे राहून दिवस काढीत आहे. शासनाकडून घरकुलाची अपेक्षा आहे. - महादेव जांगतोड, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी पूर्णेच्या महापुराने आमचे सर्वस्व नेले. घर तर पडलेच त्यासोबत घरातील १०० क्विंटल कांदे, गहू व भांडेकुंडी सर्व वाहून गेले. आज आम्ही तात्पुरती खोली बांधून त्यामध्ये सर्व कुटुंब राहत आहोत. शासनाने घरकूल द्यावे किंवा पुनर्वसनामध्ये घर बांधून द्यावे. - महादेव यावले, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी