पालक तीन रुपये किलो : भाजीपाला शेतीही न परवडणारी
कुऱ्हा : स्थानिक आठवडी बाजारातील लिलावामध्ये कोथिंबिर एक रुपये किलो, तर पालकाला केवळ तीन रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. त्यामुळे नगदी पीक म्हणून भाजीपाला शेतीकडे वळलेला शेतकरी आता काय पेरावे, या विवंचनेत अडकला आहे.
भाजीपाला पेरणीकरिता होणारा खर्च, रासायनिक खते, औषध फवारणीने उत्पादन खर्च वाढला असताना, लिलावामध्ये भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांचा कोणताही माल निघाला की, त्याला भाव नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्याची आर्थिक कुचंबना होत आहे. भाजीपाल्याला योग्य भाव मिळावा, अशी बागायती पिके काढणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
-----------------