शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नाफेड तूर केंद्रावर बच्चूंचा प्रहार

By admin | Updated: March 4, 2017 00:04 IST

अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली.

रजिस्टर जप्त : व्यापाऱ्यांचाच माल, शेतकरी रांगेतपरतवाडा : अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली. तेथील भोंगळ कारभाराबद्दल संबंधितांना खडसावले. तेथे व्यापाऱ्यांचाच माल प्रत्यक्षात आढळून आला. रजिस्टरमधील नाव नोंदणी करताना काही रेषा कोऱ्या सोडून व्यापाऱ्यांशी साटेलोटे असल्याचा प्रकार लक्षात आल्याने आमदारांनी ते रजिस्टर ताब्यात घेतले. येथील बाजार समिती यार्डात ४ जानेवारीपासून तूर खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर रात्रीलासुद्धा खरेदी करून शेतकऱ्यांना पाच सहा दिवस रांगेत ताटकळत ठेवले जात असल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकारी, ग्रेडर, व्यापाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. आतापर्यंत केंद्रांवर २२ हजार क्विंटल तूर हमीदराने खरेदी करण्यात आली. ८ कोटी ६० लक्ष रुपयांचे वाटप धनादेशाद्वारे केल्याची माहिती आकाश धुर्वे, आर.जी. गोहत्रे आदींनी दिली. आधी शेतकऱ्यांची तूर मोजा!अमरावती : केंद्र शासनाने विदेशातून १८ हजार रुपये क्विंटल डाळ आयात केली. त्यावर दोन हजार रुपये क्विंटल खर्च अशी एकूण वीस हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली आणि देशातील शेतकऱ्यांची तूर पाच हजार रुपये दराने खरेदी करीत असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणारे शासन शेतकरी विरोधी असल्याचा आरोप आ. कडूंनी लोकमतशी बोलताना केला. विदेशात तूर उत्पादनासाठी शेतजमीन भाडेतत्त्वार घेऊन कोट्यवधी रुपये दिले. तो खर्च या देशातील शेतकऱ्यांना का देण्यात आला नाही. येथे शेतकऱ्यांवर विमा नसल्याने जमिनी नापेर राहिल्याचे ते म्हणाले. व्यापाऱ्यांशी साटेलोटे करण्यापेक्षा शेतकऱ्यांची तूर मोजून त्यांना विनाविलंब धनादेश द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत आ. कडूंनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी गजानन मोरे, अंकुश जवंजाळ, दीपक धुळधर, श्याम कडू, गोपाल शेळके, वैभव निकमसह अन्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)आमदारांनी राबविले धाडसत्रउपविभागीय अधिकारी कार्यालयात नियोजित बैठकीला जात असताना शुक्रवारी आ. बच्चू कडू यांनी पूर्वसूचना न देता नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर धाड टाकली. यार्ड परिसरात तुरीच्या गंजी आढळल्या. त्याची विचारणा केल्यावर एकमेकांना नाव विचारू लागले. त्यावर आक्रमक होताच व्यापाऱ्यांची नावे पुढे आलीत. रजिस्टरची मागणी करताच संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांचा प्रताप उघडकीस आला. शेतकऱ्यांची नावे लिहिताना मधात क्रमांक टाकून रेषा कोऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यावर नंतर व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावावर तोलण्याचा प्रकार होता. आ. बच्चू कडूंनी ती पाने फाडून रजिस्टर जप्त करीत संबंधितांना खडेबोल सुनावले.