शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

By admin | Updated: May 31, 2017 00:21 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : अखेर ३६ तासांनी थांबली फरफटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. रविवारी मध्यरात्री शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पालकांचा रोष उफाळून आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तणावजन्य स्थिती पाहता सोमवारी पहाटेच तिन्ही शिशुंचे शव इर्विनच्या शवविच्छेदनगृहात नेण्यात आले. मात्र, अकोल्यातील डॉक्टरांची चमू उशिरा रात्री पर्यंत न पोहोचल्याने पालकांसह नातलग ताटकळले होते. अखेरीस रात्री ८.३० वाजता डॉक्टरांची चमू पोहोचली आणि शवविच्छेदन सुरू झाले. ही प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यामुळे पालकांना त्यांच्या चिमुकल्यांचे शव हस्तांतरीत होऊ शकले नाहीत. अखेरीस मंगळवारी सकाळी मृत शिशुंचे नातलग मृतदेह घेण्यास इर्विनच्या पोस्टमार्टम हाऊससमोर गोळा झाले. आमदार राणादेखील तेथे पोहोचले. त्यांनी गोरगरीब पालकांच्या वेदना पाहून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचून त्यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिलेत. यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास आशिष घरडे, दिनेश विरूळकर, बंटी कावरे यांनी मुलांचे पार्थिव सोपविण्यात आले. पार्थिव घेऊन तिघेही आपापल्या घरी पोहोचलेत. तेथेही चिमुकल्यांच्या मातांचा हृदय हेलावणारा आकांत सुरू होता. पुरते जगही न पाहिलेल्या आपल्या बाळांना शेवटचे पाहून त्यांना हृदयाशी कवटाळून त्यांना मातांसह नातलगांनी अंतिम निरोप दिला. बंटी कावरे यांच्या शिशूवर शंकरनगरातील स्मशानभूमित तर आशिष घरडे यांच्या बाळाचा सीआरपीएफ कॅम्प परिसरातील आणि दिनेश विरूळकर यांच्या बाळाचा फ्रेजरपुऱ्याच्या स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. मातेची प्रकृती बिघडलीपोटच्या गोळ्याचे कलेवर पाहून शिल्पा विरूळकर नामक मातेची प्रकृती अचानक बिघडली. शवविच्छेदनानंतर बाळाला घरी आणताच त्या भोवळ येऊन बेशुद्ध झाल्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता त्यांना खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.