शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिनेसृष्टीच्या मोहात घरदार सोडून मुंबईची वाट पकडतात मुले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : हीरोसारखे बनायचे म्हणून घर सोडून मुंबईला पलायन करणाऱ्या रायपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन ...

श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : हीरोसारखे बनायचे म्हणून घर सोडून मुंबईला पलायन करणाऱ्या रायपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला बडनेरा रेल्वे स्थानकाहून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. पैसा, ग्लॅमरस दुनियेचा नाद व घरातील कौटुंबिक वाद यांसह इतरही कारणांमुळे मुले पळून जाण्याचे प्रमाण बरेच आहे.

गेल्या साडेतीन वर्षात बडनेरा रेल्वे स्थानकावरून १२६ मुला-मुलींना पळून जात असताना ताब्यात घेतले. त्यांची संपूर्ण चौकशी करून रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस व चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचविण्यात आले. प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून विचारणा केली जाते. बहुतांश मुले सिनेसृष्टीच्या नादात रेल्वे गाड्यांमधून मुंबईकडे पळून जात असल्याची उदाहरणे पोलिसांच्या माहितीतून समोर आली. त्याचप्रमाणे आई-वडिलांची घरातील भांडणे, त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम यामुळेदेखील मुले घरून निघून जातात. २०२० या कोरोनाच्या वर्षात रेल्वे गाड्या फारशा सुरू नव्हत्या. यादरम्यान पळून जाणाऱ्यांची संख्या अगदी कमी असल्याचे आकडेवारीतून समोर आले. रेल्वेगाड्या सुरू होताच संख्या वाढली आहे.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

घर सोडून जाण्याची कारणे...

बॉक्स

1) अनेक मुले ग्लॅमरस दुनियेच्या मोहापायी आई-वडिलांच्या नकळत मुंबईकडे पळून जात असल्याचे पुढे आले. हीरो- हीरोईन व्हायचे, भरमसाठ पैसा कमवायचा, माझ्याकडे महागड्या गाड्या असल्या पाहिजे, ही मनीषा असतेच. आई-वडिलांची भांडणे, शिक्षणाचा कंटाळा अशी विविध धक्कादायक कारणे समोर आली आहेत.

बॉक्स

2) १० डिसेंबर २०२० रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावरील विश्रामगृहात रायपूरचा तेरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होता. रेल्वे पोलिसांनी त्याला विचारणा केली. तो घरून पळून आल्याचे समोर आले. त्याच्या डोक्यात हीरो बनण्याचे स्वप्न होते. पोलिसांनी आई-वडिलांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या सुपूर्द केले.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

प्रतिक्रिया-

सामाजिक जबाबदारीतून पळून जाणाऱ्या मुलांचे समुपदेशन केले जाते. पळून जाण्यामागील कारणे शोधली जातात. संपूर्ण चौकशीअंती नियमांच्या अधीन त्या मुलांना आई-वडिलांच्या सुपूर्द केले जाते.

बी.एस. नरवार, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल.

प्रतिक्रिया-

विविध कारणांमुळे मुले घरून निघून जात असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या जातात. कुटुंबात परत जाण्यासाठी समुपदेशन केले जाते. बऱ्याच मुला-मुलींना आई-वडिलांच्या सुपूर्द करण्यात आले.

अजितसिंह राजपूत, सहायक निरीक्षक, रेल्वे पोलीस

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

* स्थानकावर सापडलेली मुले-

२०१८ सालात - १६

२०१९ सालात - ५३

२०२० सालात - ०५

२०२१सालात - ५२ ऑगस्ट महिन्यापर्यंत

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^