शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

By admin | Updated: September 1, 2015 23:57 IST

भाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते

सुदेश मोरेअंजनगाव सुर्जीभाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते. याचा प्रत्यय एका कनिष्ठ महाविद्यालयातील रक्षाबंधन कार्यक्रमात आला. एकाच वर्गातील मुलांना त्या वर्गातील मुलांनी राख्या बांधण्याचा प्रयोग प्राथमिक शाळांमध्ये ठीक आहे. पण, इंटरनेटच्या युगात हा प्रयोग महाविद्यालयीन तरुण मुलामुलींमध्ये राबविण्याचे भलतेच धाडस एका शाळा संचालकांनी केले. अर्थात त्यामागचा उद्देश शाळेतील वातावरण सुसंस्कृत ठेवण्याचे असले, तरी ही कल्पना विद्यार्थ्यांना पचनी पडली नाही. त्यांनी त्यावर अनुपस्थितीचा सोपा उपाय शोधून काढला. कार्यक्रमाच्या दिवशी अकरावीतील मुले गायब झालेली पाहून उरलेल्या दोन मुलांना बारावीत पाठविण्यात आले. मुलांच्या रांगा लावण्यात आल्या आणि रक्षाबंधन सुरू झाले. मुुलींनी वाटीत कुंकू घेऊन मुलांना टिक्के लावले. राख्या बांधल्या. काही मुलांनी राख्या बांधणाऱ्या मुलींना पेन भेट दिले. काहींनी पैसे दिले तर काहींनी मोठे चॉकलेट दिले. कार्यक्रमात आरडाओरड व गोंधळ आवरण्यासाठी शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना दरडावले व आजच्या दिवशी तरी मुलींना मान द्या, असे आवाहन केले. हे ऐकून बारावीच्या मुलांनी आपल्या मानापुढे केल्या. व मान घ्या मान असा इरसाल अभिनय केला. एका मुुलीने तिन मुुलांना राखी बांधल्यावरही तिला कोणतीच भेट मिळाली नाही. त्याचा राग तिने शाळेतून परतताना मुलांकडे जळजळीत नजरेने पाहून व ठेवणीतल्या शिव्यांतून व्यक्त केला.शाळेच्या मैदानातला कार्यक्रम संपल्यानंतर इयत्ता अकरावीतील दोन मुले वर्गात आली आणि मुलींच्या तावडीत सापडली. बहुसंख्य मुलींनी अल्पसंख्य मुलांना हातभर राख्या बांधून त्यांचा जीव मेटाकुटीस आणला. शेवटी आपल्यास अनुपस्थित बांधवांचे अनुकरण करुन तेही वर्गाबाहेर पळून गेले. अशा प्रकारे मुुलामुलींनी ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधन धमाल एन्जॉय केला. अंजनगावातील प्रकार, कल्पना पचनी पडली नाहीजे सापडले त्यांना बांधल्या हातभर राख्यावर्गातील विद्यार्थिनी आपल्याला राखी बांधणार याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी वर्गखोलीतून काढता पाय घेतला. ज्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमाची माहिती नव्हती, असे बोटावर मोजण्याऐवढेच विद्यार्थी वर्गखोलीत असल्याने विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधल्या. यामध्ये इयत्ता अकरावीतील दोन मुलांचा समावेश होता.