शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

By admin | Updated: September 1, 2015 23:57 IST

भाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते

सुदेश मोरेअंजनगाव सुर्जीभाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते. याचा प्रत्यय एका कनिष्ठ महाविद्यालयातील रक्षाबंधन कार्यक्रमात आला. एकाच वर्गातील मुलांना त्या वर्गातील मुलांनी राख्या बांधण्याचा प्रयोग प्राथमिक शाळांमध्ये ठीक आहे. पण, इंटरनेटच्या युगात हा प्रयोग महाविद्यालयीन तरुण मुलामुलींमध्ये राबविण्याचे भलतेच धाडस एका शाळा संचालकांनी केले. अर्थात त्यामागचा उद्देश शाळेतील वातावरण सुसंस्कृत ठेवण्याचे असले, तरी ही कल्पना विद्यार्थ्यांना पचनी पडली नाही. त्यांनी त्यावर अनुपस्थितीचा सोपा उपाय शोधून काढला. कार्यक्रमाच्या दिवशी अकरावीतील मुले गायब झालेली पाहून उरलेल्या दोन मुलांना बारावीत पाठविण्यात आले. मुलांच्या रांगा लावण्यात आल्या आणि रक्षाबंधन सुरू झाले. मुुलींनी वाटीत कुंकू घेऊन मुलांना टिक्के लावले. राख्या बांधल्या. काही मुलांनी राख्या बांधणाऱ्या मुलींना पेन भेट दिले. काहींनी पैसे दिले तर काहींनी मोठे चॉकलेट दिले. कार्यक्रमात आरडाओरड व गोंधळ आवरण्यासाठी शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना दरडावले व आजच्या दिवशी तरी मुलींना मान द्या, असे आवाहन केले. हे ऐकून बारावीच्या मुलांनी आपल्या मानापुढे केल्या. व मान घ्या मान असा इरसाल अभिनय केला. एका मुुलीने तिन मुुलांना राखी बांधल्यावरही तिला कोणतीच भेट मिळाली नाही. त्याचा राग तिने शाळेतून परतताना मुलांकडे जळजळीत नजरेने पाहून व ठेवणीतल्या शिव्यांतून व्यक्त केला.शाळेच्या मैदानातला कार्यक्रम संपल्यानंतर इयत्ता अकरावीतील दोन मुले वर्गात आली आणि मुलींच्या तावडीत सापडली. बहुसंख्य मुलींनी अल्पसंख्य मुलांना हातभर राख्या बांधून त्यांचा जीव मेटाकुटीस आणला. शेवटी आपल्यास अनुपस्थित बांधवांचे अनुकरण करुन तेही वर्गाबाहेर पळून गेले. अशा प्रकारे मुुलामुलींनी ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधन धमाल एन्जॉय केला. अंजनगावातील प्रकार, कल्पना पचनी पडली नाहीजे सापडले त्यांना बांधल्या हातभर राख्यावर्गातील विद्यार्थिनी आपल्याला राखी बांधणार याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी वर्गखोलीतून काढता पाय घेतला. ज्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमाची माहिती नव्हती, असे बोटावर मोजण्याऐवढेच विद्यार्थी वर्गखोलीत असल्याने विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधल्या. यामध्ये इयत्ता अकरावीतील दोन मुलांचा समावेश होता.