शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मेळघाटात बालमृत्यूचे तांडव, शेकडो बालक आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:19 IST

मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेत खळबळ : १५ दिवसांत ३६ बालके दगावली

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहेधारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० कुपोषित बालकांनी अखेरचा श्वास घेतला, तर बिजुधावडी अंतर्गत येणाऱ्या २३ गावांमध्येच १० बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिखलदरा तालुक्यात ६ बालके दगावलीत. आॅगस्ट महिन्यात धारणी तालिक्यात ४५, चिखलदरा तालुक्यात ९ बालकांचा मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले होते. परंतु, पंधरा दिवसांतच ३६ बालकांचा मृत्यू झाले आहेत.शेकडो बालक सर्दी, खोकला, तापाने ग्रस्तधारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो बालक सर्दी खोकला तापाने फणफणत आहेत. आरोग्य यंत्रणेने याला दुजोरा दिला असून एकूण बालकांपैकी ५० टक्के बालक ग्रस्त असल्याने त्यांना निमोनियापासून वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.आजारावर जादूटोणा भूमकाचा उपचारमेळघाटात आजही आदिवासी भूमका (मांत्रिक)कडे उपचार घेतात. सर्दी खोकलासाठीसुद्धा आरोग्य केंद्रात येत नसल्याने आरोग्य विभागाची कसरत होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांनी सांगितले. दुसरीकडे सर्व औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णवाहिका असल्याचे सांगण्यात आले. मात्र बालमृत्यूचे प्रमाण कमी वाढतच आहेधारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० बालकांचा मृत्यू झाला. एकट्या बीजुधावडी आरोग्य केंद्रात १० बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, खोकला, तापाने मोठ्या प्रमाणात बालक ग्रस्त आहेत. आरोग्य केंद्रात त्यांना भरती केल्या जात आहे.- शशिकांत पवार,तालुका आरोग्य अधिकारी, धारणी