शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:10 IST

कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशाळेतील शिक्षकांचा सहभाग : शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, या दिशेने राज्य शासन कार्य करीत आहे. स्थलांतरित बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सन २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी काही मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आली. शासननिर्णयानुसार शाळाबाह्य मुलांना शाळेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली.प्रत्येक शाळेच्या ठिकाणी एका शिक्षकाची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दीड हजारांवर प्राथमिक शाळा व अन्य सर्वच खासगी शाळांमधील शिक्षक ही भूमिका बजावणार आहेत. शासनाने नवीन वेबसाइट तयार केली असून, त्यावर पालक शाळांची माहिती द्यायची आहे. बालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट टाकलेली नाही. समाजाची कुठलीही व्यक्ती रक्षक म्हणून काम करता येणार आहेत. त्या व्यक्तीने शाळाबाह्य मुलांच्या शोध घेऊन त्याची माहिती एकत्र करायची आहे. त्यानुसार नजीकच्या शाळेत वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.