शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दीडशे उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:27 IST

भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : शेतकरी-व्यापारी विशेष संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे. मुख्यमंत्र्याच्या नागपूर शहरातच तब्बल दीडशे उद्योगधंदे बंद झाल्याची शोकांतिका आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकार कुणाचे असो, ते व्यापारीविरोधी आहे. मात्र, आता लक्ष्यात ठेवा, सरकार कुणाचेही असो, आमच्याशिवाय ते बनणार नाही, असा इशारा अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी दिला.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर यांच्यावतीने मंगळवारी अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या चिली गोदामात आयोजित शेतकरी-व्यापारी विशेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, इंटरनॅशनल रिलेशन कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, अमरावती चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, अकोला येथील अध्यक्ष कैलास खंडेलवाल, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे संचालक सतीशकुमार व्याससह मान्यवर व विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.आ. कडू पुढे म्हणाले, कांद्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये शासनाने टाकले. मात्र, कांदा न खाल्ल्याने कुणी मरतं का? खरं तर कांद्यामुळे सरकारे गेली. त्यामुळे शासनाला सर्व काही सोडून कांद्याची काळजी आहे. कांद्याचे भाव वाढताच शासनाने व्यापाऱ्यांच्या गोदामावर धाडी टाकल्या. व्यापाऱ्यांनी दोन हजार रुपये क्विंटलने खरेदी केलेला कांदा ३०० रुपयांना विकला. व्यापाऱ्यांशिवाय देशात चालू शकत नाही. तेव्हा शासनाने व्यापाऱ्यांची बाजू समजावून घेण्याची गरज आहे. मी व्यापाऱ्यांना मदत करेन, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले.मॉलनंतर आॅनलाइन संस्कृतीराज्यात मॉल संस्कृतीनंतर आॅनलाइन संस्कृतीने व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आपण सर्व या संपूर्ण स्पर्धेत उतरण्यासाठी नवतरुणांना पुढे आणण्याची गरज आहे. सबसिडी पेक्षा रिटर्न्सवर इंटरेस्ट कमी करण्याची मागणी व्यापाºयांनी केली. विदर्भात चेंबरचे काम वाढवायचे असल्याने सर्व व्यापाºयांना एकजूट होण्याचे आवाहन मंडलेचा यांनी केले.संत्रा प्रक्रिया उद्योगअचलपूर नजीकच्या भूगाव येथील २०० हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी मागण्यात आली आहे. लवकरच संत्रा प्रक्रिया उद्योग उभा होईल. मुंबईच्या एका बँकेने होकार दिला आहे, असे आ. कडू म्हणाले.