शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

मुख्यमंत्री : अपंग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण, निवासी अंध विद्यालयाला भेट

By admin | Updated: February 6, 2016 00:06 IST

अपंगांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर केले जाईल.

अपंगांसाठी नवीन धोेरण चांदूरबाजार/चिखलदरा : अपंगांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर केले जाईल. त्याचप्रमाणे राज्यातील अंध, अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास अभियानांतर्गत राज्यात विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थे (नॉफ)द्वारा संचलित निवासी अंध विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाप्रसंगीही त्यांनी उपस्थिती दर्शविली. चांदूरबाजार येथील कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, इंदिराबाई कडू आदींची उपस्थिती होती, तर चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयाच्या रौप्य महोत्सवात पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आमदार अनिल बोंडे, रमेश बुंदिले, श्रीकांत देशपांडे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्र्रकांत कलोती प्रामुख्याने उपस्थित होते. चांदूरबाजार येथे बोलताना मुख्यमंंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळण्यासाठी विदर्भात प्रक्रिया उद्योग उभारले जाणे आवश्यक आहे. सिंचनावर कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी लवकरच विदर्भात प्रक्रिया उद्योग आकाराला येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. याकार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नयना कडू यांनी केले. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऋषिकेश उपाध्ये यांस तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे वामन नथ्थूजी दुधे या अपंग लाभार्थ्याला घरकुलाचा धनादेश प्रदान करण्यात आला. आपण विदर्भाच्या विकासासाठी बांधिल असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.‘नॉफ’द्वारे दुष्काळग्रस्तांसाठी ७१ हजारांची मदतयावेळी राष्ट्रीय अपंग कल्याण (नॉफ) संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ७१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला.चांदूरमध्ये विविध घोषणा पूर्णामाय पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आ.बच्चू कडू यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. अपंगांच्या पुनर्वसनाबाबत राज्य शासन सहृदयी प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. विविध घोषणा करीत कृषी कौशल्य महाविद्यालयासोबत बेलोरा- गणोजा- पूर्णा प्रकल्पावरील योजना कार्यान्वितकरण्याचे आदेश त्यांनी दिले. बोर्डी नाला, चंद्रभागा, करजगाव या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.