शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुख्यमंत्र्यांनी केले आदिवासींना बोलके

By admin | Updated: November 29, 2014 23:10 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना

महिलांनी मांडल्या समस्या : पाच तासांत पाच गावांचा दौराश्यामकांत पाण्डेय/राजेश मालवीय - धारणीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना त्यांनी आदिवासींना केली. आदिवासी महिलांनीही आपल्या परिसरातील समस्यांचा पाढा अगदी दिलखुलासपणे मुख्यमंत्र्यांसमोर वाचला.तालुक्यातील वनमालूर येथे सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री पोहोचले. त्यांना पारंपरिक आदिवासी नृत्यासह गावात आणण्यात आले. कार्यक्रमस्थळी स्वत: बोलण्याचे टाळून त्यांनी आदिवासींना बोलण्याची संधी दिली. वन संरक्षण समितीचे अध्यक्ष ब्रिजलाल मावस्कर यांनी वन विभागाचे कौतुक करीत दहा लाखांचे अनुदानातून लक्ष्मी चूलच्या माध्यमातून १५०० किलो लाकडाची बचत होत असल्याची माहिती दिली. सोलर लँप व गॅस सिलिंडरचे महत्त्व सांगितले. ५ दुधारू गाई, ११ कुक्कुटपालन, शिलाई मशीन्स दिले व समितीच्या माध्यमातून ८०० हेक्टर जमिनीवरील वनसंपत्ती वाचविल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कमलाबाई हेकडे यांनी वनाधिकारी जंगलात जनावरांना चराईसाठी मनाई करीत असल्याने आमचे लवकर पुनर्वसन करा, अशी मागणी केली. समायबाई हिराजी चिमोटे यांनी गावात वीज येत नाही, पाणी मिळत नाही, बाजारगाडीही येत नाही, आम्हाला या समस्येतून बाहेर काढा, अशी गाऱ्हाणी मांडली. यावेळी जाब विचारण्यासाठी उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सोलर लॅम्पचे वाटप केले.