शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी केले आदिवासींना बोलके

By admin | Updated: November 29, 2014 23:10 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना

महिलांनी मांडल्या समस्या : पाच तासांत पाच गावांचा दौराश्यामकांत पाण्डेय/राजेश मालवीय - धारणीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना त्यांनी आदिवासींना केली. आदिवासी महिलांनीही आपल्या परिसरातील समस्यांचा पाढा अगदी दिलखुलासपणे मुख्यमंत्र्यांसमोर वाचला.तालुक्यातील वनमालूर येथे सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री पोहोचले. त्यांना पारंपरिक आदिवासी नृत्यासह गावात आणण्यात आले. कार्यक्रमस्थळी स्वत: बोलण्याचे टाळून त्यांनी आदिवासींना बोलण्याची संधी दिली. वन संरक्षण समितीचे अध्यक्ष ब्रिजलाल मावस्कर यांनी वन विभागाचे कौतुक करीत दहा लाखांचे अनुदानातून लक्ष्मी चूलच्या माध्यमातून १५०० किलो लाकडाची बचत होत असल्याची माहिती दिली. सोलर लँप व गॅस सिलिंडरचे महत्त्व सांगितले. ५ दुधारू गाई, ११ कुक्कुटपालन, शिलाई मशीन्स दिले व समितीच्या माध्यमातून ८०० हेक्टर जमिनीवरील वनसंपत्ती वाचविल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कमलाबाई हेकडे यांनी वनाधिकारी जंगलात जनावरांना चराईसाठी मनाई करीत असल्याने आमचे लवकर पुनर्वसन करा, अशी मागणी केली. समायबाई हिराजी चिमोटे यांनी गावात वीज येत नाही, पाणी मिळत नाही, बाजारगाडीही येत नाही, आम्हाला या समस्येतून बाहेर काढा, अशी गाऱ्हाणी मांडली. यावेळी जाब विचारण्यासाठी उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सोलर लॅम्पचे वाटप केले.