शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुख्यमंत्री साहेब, चिखलदऱ्यासाठी एवढे कराच!

By admin | Updated: February 5, 2016 00:23 IST

मुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या

विकासाची प्रतीक्षा : पाणी, सिडकोे विकासाला गती, आंतरराष्ट्रीय मार्ग वळवा, पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतोयनरेंद्र जावरे चिखलदरामुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या रखडलेल्या विकासाची जाणीव आणि आठवण करून देणे गरजेचे आहे. चिखलदरा तालुक्याला परवाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हगणदारी मुक्तीचा विभागातील प्रथम पुरस्कार देण्यात आला. मात्र, येथील इतर सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष पुरवावे, अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे. चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन आहे. येथे पर्यटकांचा ओढादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. येथे वाढत चाललेले सिमेंट क्राँक्रीटचे जंगल रोखण्याचीही नितांत गरज आहे. त्यासाठी सिडकोची घोषणा झाली. ८०० कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. आता मुख्यमंत्री येत आहेतच तर त्यांनी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना प्रत्यक्ष सुरूवात करूनच टाकावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सिडकोमुळे विकास शक्य आहे. मग, त्यासाठी १५ वर्षांचा कालावधी का? चारशे कोटींवरून आठशे कोटींवर आलेला प्रकल्प कागदावरच थांबला तर त्याची किंमत दोन हजार कोटींवर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. पाण्याची समस्याही महत्त्वाचीजगाच्या नकाशावर मेळघाट म्हणजे कुपोषणाचा कलंक लागलेला एक प्रदेश. तेथीलच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. वाढती लोकसंख्या व पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथे मुबलक पाणी नाही. तीन महिने येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गेल्या दहा वर्षांपासून चिखलदरा हे पर्यटनस्थळ तहानलेले आहे. फिल्टर प्लांट नसल्यामुळे पर्यटकांना अशुध्द पाणी प्यावे लागते. पाण्यासाठी नजीकच्या बरमासक्ती येथे मोठा प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून तयार आहे. सिडकोमुळे त्याची गती मंदावली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवायला हवी. झुकझुक गाडीचा प्रवासपरतवाडा शहरापर्यंत शकुंतला रेल्वे आहे. तिला नरखेड रेल्वे मार्गाशी जोेडून इकडे चिखलदरा शहरापर्यंत नेल्यास पर्यटकांना रेल्वे मार्ग सोयीचा होऊन घाटवळणाच्या मार्गातून या रेल्वेत बसून फिरण्याचा आल्हाददायी आनंद पर्यटकांना घेता येईल. चौपदरीकरणामुळे होणार विकास नागपूर-इंदूर हा चौपदरीकरणाचा आंतरराज्यीय महामार्ग घोषित झाला आहे. परतवाड्यावरून हा मार्ग घटांग-सेमाडोेह असा जाणार आहे. परंतु तो परतवाडा-चिखलदरा-सेमाडोेह-धारणी असा झाल्यास सर्वाधिक वाहतूक या पर्यटनस्थळावरून होेईल. नागपूर, इंदूर या दोन राज्यांच्या महत्त्वपूर्ण महानगराच्या मधात चिखलदरा पर्यटनस्थळ होणार आहे. ना. नितीन गडकरी यांनी हा मार्ग घोषित केला तेव्हा त्याला चिखलदऱ्यावरून वळविल्यास येथे पर्यटकांची रीघ लागेल, हे येथे उल्लेखनीय.