शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

By admin | Updated: September 6, 2016 00:09 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला.

दीपक केसरकरही गप्पच : प्रथमेश, अजयच्या जीवाचे मोल शून्य !अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यांसंबंधी आश्रमाच्या भूमिकेबाबत नाना प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी जिल्हा धगधगतोय. सामान्यांना प्रकरणाची सीआयडी चौकशी हवी आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महिना उलटूनही या प्रकरणी आश्चर्यकारक शांत आहेत. नरबळीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर आश्रमाने अनेक सत्य लपवून ठेवले. अजय वणवेवर झालेला नरबळीचा हल्ला लपवून तो स्वच्छतागृहात पडल्याचे खोटे चित्र उभे केले. प्रथमेश सगणे याचा गळा नरबळीसाठी कापला असताना तो वरच्या माळ्यावरुन पडल्याचा बनाव करण्यात आला. दोन्ही घटनांची आश्रमाने स्वत:हून पोलीस तक्रार दिली नाही. सामाजिक न्याय आणि शिक्षण खात्यांना माहिती दिली नाही. अजय वणवेच्या आईने तक्रार दिल्यावर ती मागे घेण्यासाठी आश्रमातील यंत्रणा वापरली जात आहे. प्रथमेश सगणे याच्या नातेवाईकांवर दबाव कसण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. ‘लोकमत’ने हे प्रकरण शोधून काढल्यामुळे नरबळी प्रकरणाला वाचा फुटली. आम्ही सांगतो, तशी ‘लोकमत’ आणि प्रतिनिधीविरुद्ध वक्तव्ये द्या, असाही दबाव नातेवाईकांवर आणण्यात आला. नरबळी प्रकरणाला महिना उलटून आश्रमाने एकदाही भूमिका मांडली नाही. बातम्या छापल्या न जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कापून टाकण्याची भाषा वापरली. लोकांनी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आणि शंकर महाराजांच्या अटकेसाठी रान उठविले. चांदूरेल्वे, धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी कडकडीत बंद पाळला गेला. पिंपळखुटा येथील आश्रमावर अमरावतीतून मोटरसायकल मार्च धडकला. अमरावतीत महामोर्चा निघाला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिली गेली. सर्वच आंदोलनांत सर्वपक्षीय लोक सहभागी झालेत. आंदोलने उभारणाऱ्या आणि निवेदने देणाऱ्या ५० पेक्षा अधिक संघटना महिनाभरापासून प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी पोटतिडकीने लढत आहेत. घटनेची पाळेमुळे खोल रुजली आहेत. आश्रमाची आणि तमाम पदाधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत केव्हाच पोहोचली आहे. शासनाचा हत्ती मात्र जराही हललेला नाही. भाजपाच्या राज्यात दलित हिंदू म्हणून जगणाऱ्या मातंग आणि चर्मकारांची मुले बळी देण्यासाठी वापरली जातात आणि शासन हिंदूत्वाच्या नावावर आश्रमाच्या, महाराजांच्या पाठीशी उभे ठाकते, या भावनेने दुखावलेल्या समाजाने धर्मांतरणाच्या मुद्यावर बैठकही घेतली. तरीही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर कमालीचे शांत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याचे भाचे आहेत. मामांच्या गावातील न्यायासाठी लढणाऱ्या लोकांचा एकच सवाल आहे - सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?