शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

By admin | Updated: September 6, 2016 00:09 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला.

दीपक केसरकरही गप्पच : प्रथमेश, अजयच्या जीवाचे मोल शून्य !अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यांसंबंधी आश्रमाच्या भूमिकेबाबत नाना प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी जिल्हा धगधगतोय. सामान्यांना प्रकरणाची सीआयडी चौकशी हवी आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महिना उलटूनही या प्रकरणी आश्चर्यकारक शांत आहेत. नरबळीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर आश्रमाने अनेक सत्य लपवून ठेवले. अजय वणवेवर झालेला नरबळीचा हल्ला लपवून तो स्वच्छतागृहात पडल्याचे खोटे चित्र उभे केले. प्रथमेश सगणे याचा गळा नरबळीसाठी कापला असताना तो वरच्या माळ्यावरुन पडल्याचा बनाव करण्यात आला. दोन्ही घटनांची आश्रमाने स्वत:हून पोलीस तक्रार दिली नाही. सामाजिक न्याय आणि शिक्षण खात्यांना माहिती दिली नाही. अजय वणवेच्या आईने तक्रार दिल्यावर ती मागे घेण्यासाठी आश्रमातील यंत्रणा वापरली जात आहे. प्रथमेश सगणे याच्या नातेवाईकांवर दबाव कसण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. ‘लोकमत’ने हे प्रकरण शोधून काढल्यामुळे नरबळी प्रकरणाला वाचा फुटली. आम्ही सांगतो, तशी ‘लोकमत’ आणि प्रतिनिधीविरुद्ध वक्तव्ये द्या, असाही दबाव नातेवाईकांवर आणण्यात आला. नरबळी प्रकरणाला महिना उलटून आश्रमाने एकदाही भूमिका मांडली नाही. बातम्या छापल्या न जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कापून टाकण्याची भाषा वापरली. लोकांनी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आणि शंकर महाराजांच्या अटकेसाठी रान उठविले. चांदूरेल्वे, धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी कडकडीत बंद पाळला गेला. पिंपळखुटा येथील आश्रमावर अमरावतीतून मोटरसायकल मार्च धडकला. अमरावतीत महामोर्चा निघाला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिली गेली. सर्वच आंदोलनांत सर्वपक्षीय लोक सहभागी झालेत. आंदोलने उभारणाऱ्या आणि निवेदने देणाऱ्या ५० पेक्षा अधिक संघटना महिनाभरापासून प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी पोटतिडकीने लढत आहेत. घटनेची पाळेमुळे खोल रुजली आहेत. आश्रमाची आणि तमाम पदाधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत केव्हाच पोहोचली आहे. शासनाचा हत्ती मात्र जराही हललेला नाही. भाजपाच्या राज्यात दलित हिंदू म्हणून जगणाऱ्या मातंग आणि चर्मकारांची मुले बळी देण्यासाठी वापरली जातात आणि शासन हिंदूत्वाच्या नावावर आश्रमाच्या, महाराजांच्या पाठीशी उभे ठाकते, या भावनेने दुखावलेल्या समाजाने धर्मांतरणाच्या मुद्यावर बैठकही घेतली. तरीही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर कमालीचे शांत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याचे भाचे आहेत. मामांच्या गावातील न्यायासाठी लढणाऱ्या लोकांचा एकच सवाल आहे - सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?