शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

वनगुन्ह्यांचे रेकॉर्ड तपासणार

By admin | Updated: September 21, 2015 00:00 IST

वनविभागाचे कायदे हे पोलीस विभागापेक्षाही कठोर असताना न्यायालयात व्यवस्थित पाठपुरावा केला जात नसल्याने वनगुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे

शासन आदेश : ब्रिटिशकालीनकायद्याच्या फाईलवरील धूळ झटकणारलोकमत विशेषगणेश वासनिक अमरावतीवनविभागाचे कायदे हे पोलीस विभागापेक्षाही कठोर असताना न्यायालयात व्यवस्थित पाठपुरावा केला जात नसल्याने वनगुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने ब्रिटिशकालीन कायद्याच्या फाईलवरील धूळ झटकून २० वर्षांपासूनच्या वनगुन्ह्यांचे रेकॉर्ड तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कार्यप्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनविभागात वनगुन्हे दाखल केले जातात. ही पद्धत ब्रिटिशकालीन असून वन्यजीव कायद्यात १५ ते २० वर्षांपर्यत आरोपींना शिक्षा होईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, वनविभागात तपास अधिकारी संबंधित प्रकरणाचा न्यायालयात व्यवस्थितपणे कागदपत्रांचा पाठपुरावा करीत नसल्याने गंभीर गुन्ह्यातही आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. परिणामी जंगल, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटीशकालीन कायद्याच्या फाईलवर चढलेली अनेक वर्षांपासूनची धूळ झटकण्यासाठी रेकॉर्ड तपासणी केली जात आहे. पोलीस विभागात भारतीय दंड संहितेत खून, खुनाचा प्रयत्न अथवा दरोड्याप्रकरणी न्यायालयातून जामीन मिळत नाही. किंबहुना किरकोळ प्रकरणात जामीन सहजतेने मिळते. परंतु वनगुन्ह्यात सदर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात व्यवस्थितपणे बाजू मांडली तर किमान ९० दिवसांपर्यत जामीन मिळत नाही. मात्र वनविभागात नवीन पद भरती, वनकायद्याचे अज्ञान, संरक्षण कायद्याची माहिती नाही, पुस्तकी किंवा तुटपुंज्या माहितीच्या आधारे गुन्हे दाखल करणे, न्यायालयात उशिरा प्रकरण दाखल करणे, तपास अधिकाऱ्यांची न्यायालयीन उदासिनता अशा विविध कारणांनी वनगुन्ह्यात आरोपींना शिक्षा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. वनविभागात वर्षांनुवर्षांपासून सुरु असलेला वनगुन्हे दाखल करण्याचा शिरस्ता कालबाह्य करण्यासाठी जुन्या प्रकरणांची चाचपणी केली जात आहे. २० वर्षांपासूचे रेकॉर्ड तपासताना वनगुन्ह्यात जप्त केलेले साहित्य, वाहने, वन्यपशुंचे अवशेष तपासले जाणार आहे. वाघ, बिबट, हरिण, हत्ती, सिंह आदी वन्यपशुंच्या हत्या प्रकरणानंतर न्यायालयात कागदपत्रे सादर करताना झालेली दिरंगाई आदी कारणमीमांसा शोधली जाणार आहे. वर्तूळ अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील दाखल करण्यात आलेल्या वनगुन्ह्यांची माहिती उपवनसंरक्षकांना पाठवावी लागणार आहे. शासन आदेश धडकताच मुख्य वनसंरक्षक कामाला लागले आहे. जंगलाचे संरक्षण, वन्यपशुंच्या शिकार प्रकरणी जुन्या प्रकरणांचा आढावा घेतला जात आहे.वनगुन्ह्यांत तपास करताना वरिष्ठांचे असहकार्यवन्यपशुंचे शिकार प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लावताना आरोपीला अटक करेपर्यंत तपास अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बरेचदा तपास कामी परराज्यातही जावे लागते. मात्र पोलीस विभागाप्रमाणे वन विभागात भत्ता, सुविधा दिली जात नाही. एवढेच नव्हे, तर वरिष्ठांचे असहकार्य मिळत असल्याचे शल्य वनगुन्ह्यांचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आहे.वन कोठडीचा अभाववनगुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर त्या आरोपीला जेरबंद करून ठेवण्यासाठी वन विभागात कोठडीचा अभाव आहे. यापूर्वी वन विभागात जिल्हास्तरावर वनकोठडी होती. परंतु कालांतराने त्या बंद करण्यात आल्यात. हल्ली वनगुन्ह्यात आरोपीस अटक केली तर त्या आरोपींना जवळील पोलीस ठाण्याच्या कोठडीत जेरबंद केले जाते. वन विभागात कठोर कायदे असले तरी वन कोठडी नाही, हे वास्तव आहे.वर्तुळ अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील वनगुन्ह्याची माहिती कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कोणत्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली, हे शासनाला कळवावे लागणार आहे. जुने रेकॉर्ड तपासले जात आहे.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.