शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बच्चू कडूंनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या ...

ठळक मुद्देहायवेच्या कामात दुर्लक्ष : नागरिकांचा त्रासाचा उद्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या मार्गावर एक अपघात झाला. तो पाहून आ. कडू यांनी सुपरवायझरच्या कानशिलात हाणल्या.महामार्गाच्या कामात पिवळी मातीचांदूरबाजार : राष्ट्रीय महामार्गाचे कामात पिवळ्या मातीवर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दृष्टीरोग, अस्थमा, चर्मरोग आजाराचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या मार्गावर काही ठिकाणी चिखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आ. बच्चू कडू कुरळपूर्णा येथून चांदूर बाजार येथे परत येत असताना हैदतपूर वडाळा या गावाजवळ रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडला. रस्त्यावर पाणी टाकल्याने सर्वत्र पिवळी माती उडत होती. याची दखल घेत आ. कडू यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली. मात्र सुपरवायझरतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आ. बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात हाणल्या. तसेच २४ तासात रस्त्याच्या बांधकामात पाण्याचा योग्य वापर न केल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या कानशिलेत हाणणार असल्याचा इशारा दिला.