शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

ग्रामपंचायतींच्या बेलगाम करवसुलीला बसणार चाप

By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST

ग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित

गजानन मोहोड - अमरावतीग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित पध्दत घटनाबाह्य ठरविली आहे. न्यायालयाचा या निर्णयाचा ग्रामपंचायतींना चांगला फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बेलगाम वसुलीस चाप लागणार आहे.न्यायालयाच्या या निर्णयाबाबत शासन आव्हान याचिका दाखल करणार किंवा फेरविचार याचिका दाखल करणार हे तूर्तास गुलदस्त्यात आहे. सध्या शासनाने सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेला शासनाचे अद्याप कुठलेच आदेश प्राप्त नाही. मात्र हा विषय ऐकिवात आहे व शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हा परिषद सूत्रांनी दिली.जिल्ह्यात ९३५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींद्वारा दर्जानुसार प्रतीचौरस फुटाप्रमाणे इमारती व मोकळ्या जागेवर कराची आकारणी सन २००० पासून करण्यात येत आहे. या कर आकारणीच्या पध्दतीमध्ये शासनाच्या निर्धारित नियमांच्या चौकटीत राहूनच कर निश्चित करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. तसे पाहता नागरिकांवर बोजा पडू नये यासाठी कमी कर आकारणीची ग्रामपंचायतींची मानसिकता आहे. वर्षाला एकदा तरी मालमत्ता कर भरावा लागतो. याशिवाय ग्रामपंचायतींचे विविध करदेखील असतात. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते. या कराद्वारे मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायती आपला विकास साध्य करतात.गावात मूलभूत सुविधांची निर्मिती व्हावी याकडे ग्रामपंचायतींचा कल असतो. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती आपल्या अधिकार क्षेत्रामधील मालमत्ता कर अधिकाधिक वसुली करण्याकडे लक्ष केंद्रित करतात. मात्र याविषयी मराठवाड्यामधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सन २००१ मध्ये जनहित याचिका दाखल करुन आव्हान दिले. याविषयीचा निवाडा याच आठवड्यात बाहेर आला आहे. तूर्तास प्रशासनाने यावर सावध भूमिका घेतली आहे व सध्याच्या प्रयलीत पद्धतीनुसारच कर आकारणी व वसुली होत आहे.