शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या प्रक्रियेत बदल

By admin | Updated: July 14, 2014 23:43 IST

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली असून मंजुरीच्या अधिकारातही शासनाने बदल केला आहे़ कार्यकारी अभियंत्यांना आता दोन कोटी रूपयांपर्यंत तांत्रिक मान्यतेचे अधिकार दिले आहेत़

मोहन राऊत - अमरावतीग्रामीण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली असून मंजुरीच्या अधिकारातही शासनाने बदल केला आहे़ कार्यकारी अभियंत्यांना आता दोन कोटी रूपयांपर्यंत तांत्रिक मान्यतेचे अधिकार दिले आहेत़मागील १४ वर्षांपासून गावस्तरावर पाणीपुरवठा योजने संदर्भात अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या़ या समित्यांना विशेष अधिकार देण्यात आल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याऐवजी संथ गतीने या योजनेचे कामकाज चालत होते़ आता शासनाने या योजनेत बदल केला आहे़ नवीन धोरणानुसार, १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली आहे़ यापूर्वी ही लोकवर्गणी संबंधित योजनेचा कंत्राटदार भरून गावातील कामे करीत असे. विशेषत: अनेक गावांत समितीचे पदाधिकारी लोकवर्गणी भरून ही टक्केवारीचे कामे करीत असल्याच्या अनेक तक्रारी राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याकडे गेल्या होत्या. त्यामुळे लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली आहे़ गावातील पाणीपुरवठा योजना मंजूर करताना कार्यकारी अभियंत्यांना दोन कोटींपर्यंतच्या योजनेच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहे़ विशेषत: २ कोटी ते ७ कोटी ५० लाखापर्यंत तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहे़ तांत्रीक मान्यतेप्रमाणेच प्रशासकीय मान्यतेच्या अधिकारातही बदल करण्यात आला आहे़५० लाखापर्यंतची योजना मंजूर करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिले आहेत़ तर ५० लाख ते ७ कोटी ५० लाख पर्यंतची योजना मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापन समितीला तसेच ७ कोटी ५० लाखावरील योजना मंजूर करण्याचे अधिकार शासनाला देण्यात आले आहे़ परंतु दोन कोटी रुपयांपर्यंतच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला दिल्याबद्दल गावातून नाराजीचा सूर उमटत आल्याचे दिसत आहे़ २ कोटी ते ७ कोटी ५० लाख रुपयांपर्यंतच्या अंमलबजावणीचे अधिकार जिल्हा परिषदेला तर ७ कोटी ५० लाखांवरील योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहे़