शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

थंडीमुळे प्राथमिक,माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल

By admin | Updated: December 20, 2014 00:06 IST

सध्या शहर व जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

अमरावती : सध्या शहर व जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे. कडाक्याची थंडी लक्षात घेता सकाळच्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांचेकडे निवेदनाव्दारे केली होती. या मागणीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ८.३० वाजता भरतील. याबाबतचे आदेशही शाळांना रवाना करण्यात आले आहेत. सध्या थंडीची लाट पसरली आहे. यामुळे विद्यार्थी हैराण होत आहेत. आजारही बळावत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडे पुरेशी थंडीपासून संरक्षणाची सोय नसल्याने थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शाळेची वेळ बदलविण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत शिवसैनिकांनी निवनेदनातून व्यक्त केले होते. अन्यथा शाळांना कुलूप ठोकणारमुलांना विद्यार्थ्या सोबतच पालकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे . त्यासोबतच अनेक शिक्षक ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सेवा देतात त्यांनाही शाळेत जाताना थंडीचा सामना करावा लागत आहे . ही सर्व बाब लक्षात घेता शिक्षण विभागाने शाळाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी यांचे कडे लावून धरली. दरम्यान शिक्षणाधिकारी यांनी थंडीची लाट कायम असेपर्यत प्रायमरी व प्राथमिक शाळांचे वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी ८. ३० वाजता भरविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आंदोलनाने शाळांची वेळ बदलली असल्यामुळे विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे निवेदन देतेवेळी अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, रामदास ढगे, संजय बुंदिले, अकुंर डवरे, बाबाराव वैध, निजाम सरकारल छोटू इंगोले, शैलेद्र डहाके, अतुल सोनकुसरे, विशाल जाधव, पीटू चावरे रवि काळबांडे, उमेश गोगटे आदी उपस्थित होते.