शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सत्र (सेमिस्टर) पॅटर्न परीक्षेत आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. २८ मार्च रोजी त्याअनुषंगाने अध्यादेश जारी करण्यात आले आहे.महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये गतवर्षीपासून सेमिस्टर पॅटर्न परीक्षा लागू केली. यानिर्णयाची अंमलबजावणी पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू झाली. मात्र, सेमिस्टर पॅटर्नमुळे ...

ठळक मुद्देमहाविद्यालयांना दिलासा : २८ मार्च रोजी नवा अध्यादेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सत्र (सेमिस्टर) पॅटर्न परीक्षेत आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. २८ मार्च रोजी त्याअनुषंगाने अध्यादेश जारी करण्यात आले आहे.महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये गतवर्षीपासून सेमिस्टर पॅटर्न परीक्षा लागू केली. यानिर्णयाची अंमलबजावणी पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू झाली. मात्र, सेमिस्टर पॅटर्नमुळे महाविद्यालयांचे वेळापत्रक कोलमडले .सेमिस्टर पॅटर्न परीक्षा नको, असा सूर नुकत्याच पार पडलेल्या सिनेट सभेत उमटला. परंतु, सिनेट सभेपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने २८ मार्च रोजी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत आमुलाग्र बदल करण्यासाठीचा अध्यादेश जारी केला. सिनेट सभेत हा विषय येताच सदस्यांनी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेबाबतच्या धोरणावर अक्षरश: हल्ला चढविला होता. सेमिस्टर पॅटर्न परीक्षेत दोन वर्षीय अभ्यासक्रम (४ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, तीन वर्षीय अभ्यासक्रम (६ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, चार वर्षीय अभ्यासक्रम (८ सत्रीय) पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, पाच वर्षीय अभ्यासक्रम (१० सत्रीय) पहिले, तिसरे, पाचवे व सातवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचा निर्णय झाला आहे. विद्यापीठस्तरावर एक वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले व दुसरे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, दोन वर्षीय अभ्यासक्रम (४ सत्रीय) तिसरे व चौथे सत्र अभ्यासक्रम परीक्षा, तीन वर्षीय अभ्यासक्रम (६ सत्रीय) तिसरे, चौथे, पाचवे व सहावे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, चार वर्षीय अभ्यासक्रम (८ सत्रीय) दुसरे चौथे, सहावे, सातवे व आठवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे व आठवे सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा, पाच वर्षीय अभ्यासक्रम (१० सत्रीय) अभ्यासक्रमाची परीक्षा दुसरे, चौथे, सहावे, आठवे, नववे व दहावे सत्र अभ्यासक्रमाचा परीक्षा घेतल्या जातील.नव्या अध्यादेशानुसार परीक्षा संचालन विद्यापीठाकडे आले आहे. महाविद्यालयांना केवळ परीक्षा घेणे, गुणपत्रिकांची तपासणी करणे आणि विद्यार्थ्यांचे गुण हे एका सीटमध्ये पाठविणे एवढीच कामे करावी लागणार आहे.- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग