शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बीडीओंच्या बदलीचा ठराव

By admin | Updated: July 13, 2014 23:42 IST

पंचायत समिती सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे.

खामगाव : येथील पंचायत समिती विविध कारणांमुळे गाजत असून येथील गटविकास विकास अधिकारी पी.आर.वाघ यांच्या कारकीर्दीमुळे पंचायत समिती सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे. त्यामुळे येथील पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे. प्रशासकीय कामकाज करताना अधिकार्‍यांना अधिनस्त कर्मचारी तसेच लोकसेवेसाठी निवडून आलेले जनप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून कामकाज करावे लागते. कर्मचार्‍यांनीही अधिकार्‍यांना सहकार्य करणे अपेक्षित असते. तरच कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार सुरळीत होवू शकतो. मात्र येथे सुरुवातीपासूनच समन्वयाचा अभाव दिसून येतो. याआधीही कदाचित तेलगोटे नामक प्रामाणिक गटविकास अधिकारी असताना त्यांची बदली व्हावी व प्रभार मिळावा, यासाठी कामबंद, असहकार यासारखी आंदोलने झाली. तर त्यानंतर येथे प्रभारी गटविकास अधिकारी राहिला. तर आता गटविकास अधिकारी म्हणून पी.आर.वाघ हे आहेत. गत काही दिवसांअगोदर याच भावनेतून त्यांच्या टेबलमध्ये गांज्याची पुडी ठेवण्यात आल्याचे व पोलिसांना कळविण्यात आल्याचा प्रकार अजूनही चर्चेत आहे. तसेच कर्मचारी महिलेसोबत अनैतिक संबंधाचे आरोप झाल्याचे ऐकण्यात येते. त्यामुळे असे जीवनातून उठविण्याचे प्रकार अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये सुरु आहेत. पी.आर.वाघ येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांचे पगारातून कपात होणारे एलआयसीचे हप्त्याची पगारातून कपात करणे बंद करुन एलआयसी अंगावर घेतली. तसेच कर्मचार्‍यांच्या बँक कर्ज ओ.डी.प्रकरणातही ह्यअर्थपूर्णह्ण व्यवहार होत आहेत. आयकर रिटर्नचे फॉर्म अमुकाकडूनच भरणे व त्यासाठी एकत्रित निधी गोळा करणे, यासाठी काही कर्मचारी सुध्दा फिल्डींगला ठेवले आहेत. यामुळेच कर्मचारी त्रस्त झाल्याचे खाजगीत बोलताना सांगतात. तर हाच अनुभव पंचायत समितीचे सदस्यांना सुध्दा आला. त्यामुळे गत पंधरवड्यात झालेल्या पं.स.च्या सभेत सदस्यांनी गटविकास अधिकारी पी.आर.वाघ यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे. बँकेची कामे वेळेवर न करणे, पदाधिकारी यांना विश्‍वासात न घेणे, न सांगता बैलजोडी वाटप करणे ही व इतर कारणे ठरावासाठी कारणीभूत ठरली आहेत. या ठरावाचे सूचक पं.स.सदस्य चैतन्य पाटील तर अनुमोदक सज्जाद उल्लाखान हे होते. तसेच या ठरावावर सभापती सतीष चव्हाण यांच्यासह इतर सत्ताधारी पंचायत समिती सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या ठरावामुळे पंचायत समिती पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे.