शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या १७ बाजार समिती संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:07 IST

येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजनावरांचे अवैध वाहतूक प्रकरण : २१ संचालकांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक बाजार समितीच्या आवारातील अवैध जनावरांचे वाहतूक प्रकरण ११ जून रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती. पहिल्याच दिवशी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिवांवरही कारवाई झाली. बुधवार, २७ जून रोजी संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात आली. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली. त्यानंतर बाजार समितीच्या २१ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली आहे.एसडीपीओ जयंत मिणा यांनी सर्व संचालकांना सकाळी ९ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. मिणा यांनी स्वत: दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून, पुढील कारवाईचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले. ठाणेदारांनी संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२० ब, ४६५, ४६८, ३४ व सहकलम ५ अ, ११ ई व ड अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर दीडच्या सुमारास १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली. चौकशीकरिता बोलावलेल्या इतर संचालकांना अटकेतून सूट देण्यात आली.जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात संचालकांना अटक होण्याची घटना राज्यात एकमेव चांदूर बाजार येथील बाजार समितीत घडली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या संचालकांमध्ये बबलू देशमुख गटाचे सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, अरविंद लंगोटे, मनोज नांगलिया, अमोल लंगोटे, प्रमोद घुलक्षे, नंदकिशोर वासनकर, हरिभाऊ बोंडे, विलास शेकार, सतीश धोंडे तसेच प्रहारचे मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, सुभाष मेश्राम, सत्तारखाँसह तज्ज्ञ संचालक विलास तायवाडे, सतीश मोहड, पणन महासंघाने नियुक्त केलेले संचालक सुरेश विधाते यांचा समावेश आहे.पोलीस ठाण्यापुढे गर्दीसंचालक मंडळाला अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी पोलीस ठाण्यापुढे झाली होती. अटक करूनही त्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत न्यायालयात हजर न केल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आले होते.प्रकरणात केवळ चौकीदार दोषी नसून, संचालक मंडळही दोषी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.- अजय आकरे, ठाणेदार