शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

चांदूरच्या १७ बाजार समिती संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:07 IST

येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजनावरांचे अवैध वाहतूक प्रकरण : २१ संचालकांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक बाजार समितीच्या आवारातील अवैध जनावरांचे वाहतूक प्रकरण ११ जून रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती. पहिल्याच दिवशी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिवांवरही कारवाई झाली. बुधवार, २७ जून रोजी संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात आली. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली. त्यानंतर बाजार समितीच्या २१ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली आहे.एसडीपीओ जयंत मिणा यांनी सर्व संचालकांना सकाळी ९ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. मिणा यांनी स्वत: दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून, पुढील कारवाईचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले. ठाणेदारांनी संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२० ब, ४६५, ४६८, ३४ व सहकलम ५ अ, ११ ई व ड अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर दीडच्या सुमारास १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली. चौकशीकरिता बोलावलेल्या इतर संचालकांना अटकेतून सूट देण्यात आली.जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात संचालकांना अटक होण्याची घटना राज्यात एकमेव चांदूर बाजार येथील बाजार समितीत घडली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या संचालकांमध्ये बबलू देशमुख गटाचे सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, अरविंद लंगोटे, मनोज नांगलिया, अमोल लंगोटे, प्रमोद घुलक्षे, नंदकिशोर वासनकर, हरिभाऊ बोंडे, विलास शेकार, सतीश धोंडे तसेच प्रहारचे मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, सुभाष मेश्राम, सत्तारखाँसह तज्ज्ञ संचालक विलास तायवाडे, सतीश मोहड, पणन महासंघाने नियुक्त केलेले संचालक सुरेश विधाते यांचा समावेश आहे.पोलीस ठाण्यापुढे गर्दीसंचालक मंडळाला अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी पोलीस ठाण्यापुढे झाली होती. अटक करूनही त्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत न्यायालयात हजर न केल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आले होते.प्रकरणात केवळ चौकीदार दोषी नसून, संचालक मंडळही दोषी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.- अजय आकरे, ठाणेदार