शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:52 IST

रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० हजार ५५८ शेतकऱ्यांचा समावेश : संत्रा, कांदा, हरभरा, गहू पिकांना फटका

सुमित हरकुट।आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. अन्य तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे.तालुक्यातील सात मंडळांतील १५४ गावांना गारपिटीने गारद केले. यात शेतकऱ्यांचा संत्रा, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. चांदूरबाजार मंडळात ४२७८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. बेलोरा मंडळात ४५० हेक्टर, तळेगाव मोहना मंडळात ३ हजार ४६९ हेक्टर, करजगाव मंडळात १९० हेक्टर, आसेगाव मंडळात ५९५ हेक्टर, शिरजगाव कसबा मंडळात ४ हजार ३१६, ब्राह्मणवाडा थडी मंडळात ३८०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रापिकाचे ६ हजार ८९५ हेक्टर, कांदा पिकाचे १ हजार ५०३ हेक्टर, गहू १ हजार ७६७ हेक्टर, हरभरा ३ हजार ९३८ हेक्टर व अन्य पिकांचे १४० हेक्टरमधील नुकसान झाले. वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिसेवक व मंडळ अधिकाºयांना दिले असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. याचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.अधिकारी-शेतकरी पंचनाम्यासाठी शेतातमहसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सरपंच व गावातील दोन प्रतिष्ठित शेतकरी यांच्याशी संपर्क साधून शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा मंडळाला बसला आहे.तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्तनुकसानीचा खरा अंदाज येण्यासाठी आणखी काही अवधी लागेल. कृषी व महसूल विभाग एकत्र काम करीत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. खरी आकडेवारी महसूलला द्यावी, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी चकरा मारत आहेत.अचलपूर तालुक्यातील ५७ गावांत नुकसानरविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका अचलपूर तालुक्यातील ५७ गावांना बसला. त्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळपिके, तर ३८७५ हेक्टरवरील शेती पिके असे एकूण ७९६९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.