शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:52 IST

रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० हजार ५५८ शेतकऱ्यांचा समावेश : संत्रा, कांदा, हरभरा, गहू पिकांना फटका

सुमित हरकुट।आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. अन्य तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे.तालुक्यातील सात मंडळांतील १५४ गावांना गारपिटीने गारद केले. यात शेतकऱ्यांचा संत्रा, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. चांदूरबाजार मंडळात ४२७८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. बेलोरा मंडळात ४५० हेक्टर, तळेगाव मोहना मंडळात ३ हजार ४६९ हेक्टर, करजगाव मंडळात १९० हेक्टर, आसेगाव मंडळात ५९५ हेक्टर, शिरजगाव कसबा मंडळात ४ हजार ३१६, ब्राह्मणवाडा थडी मंडळात ३८०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रापिकाचे ६ हजार ८९५ हेक्टर, कांदा पिकाचे १ हजार ५०३ हेक्टर, गहू १ हजार ७६७ हेक्टर, हरभरा ३ हजार ९३८ हेक्टर व अन्य पिकांचे १४० हेक्टरमधील नुकसान झाले. वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिसेवक व मंडळ अधिकाºयांना दिले असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. याचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.अधिकारी-शेतकरी पंचनाम्यासाठी शेतातमहसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सरपंच व गावातील दोन प्रतिष्ठित शेतकरी यांच्याशी संपर्क साधून शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा मंडळाला बसला आहे.तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्तनुकसानीचा खरा अंदाज येण्यासाठी आणखी काही अवधी लागेल. कृषी व महसूल विभाग एकत्र काम करीत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. खरी आकडेवारी महसूलला द्यावी, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी चकरा मारत आहेत.अचलपूर तालुक्यातील ५७ गावांत नुकसानरविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका अचलपूर तालुक्यातील ५७ गावांना बसला. त्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळपिके, तर ३८७५ हेक्टरवरील शेती पिके असे एकूण ७९६९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.