शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

रवि राणांना आव्हान, रविवारी सामना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:16 IST

कल्याणनगर ते यशोदानगर या कामाशी पालकमंत्र्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर आ. रवि राणा आरोप करीत आहेत. विषय वेगळाच आहे. प्रत्यक्षात राणा हेच बालक अन् खोटारडेदेखील आहेत.

ठळक मुद्देतुषार भारतीय : सोमवारी राणांच्या घरासमोर लावणार बेशरमचे झाड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कल्याणनगर ते यशोदानगर या कामाशी पालकमंत्र्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर आ. रवि राणा आरोप करीत आहेत. विषय वेगळाच आहे. प्रत्यक्षात राणा हेच बालक अन् खोटारडेदेखील आहेत. त्यांनी रविवारी याच ठिकाणी कागदपत्रांसह उपस्थित राहावे; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्यावे, असे आव्हान नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिले.कल्याणनगरच्या कामाचा निधी माझ्या नावाने आलेला आहे. याबाबत ७ मार्च २०१८ चे अवर सचिवांचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे २३ मार्चचे पत्र आहे. कामाला प्रशासकीय मान्यतेचे कार्यकारी अभियंत्यांचे पत्र आहे. महापालिकेऐवजी बांधकाम विभागाला एजन्सी द्यावी, असे रवि राणांचे १६ मार्चचे पत्र आहे. त्या ३९ कामांमध्ये कुठेही कल्याणनगर ते यशोदानगर या कामाचा उल्लेख नाही. बांधकाम विभागाद्वारे १९ कामांमध्ये हे काम क्लब केले आहे. याबाबत १३ मार्चचेदेखील पत्र आहे. या कल्याणनगर ते यशोदानगरच्या कामाशी रवि राणांचा कुठेही संबंध नाही. दिशाभूल करणे त्यांना शोभत नसले तरी त्यांची परंपरा आहे. धमक असल्यास २४ मार्चला श्रमिक पत्रकार संघात सकाळी ११ वाजता कागदपत्रांसह या, असे जाहीर आव्हान तुषार भारतीय यांनी रवि राणांना दिले. मुख्यमंत्र्यांचा शेरा असलेले पत्र हे पर्यटन विभागाच्या निधीसंदर्भात आहे. तेही मूलभूत निधीबाबत आहे. राणांच्या कामांच्या यादीतच ते नाही. ज्याला कागदाचा अर्थ कळत नाही, तोच बालक असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. त्यांना या कामाचा अधिकारच नाही. त्यांची कामे ही जनतेच्या नव्हे, कंत्राटदारांच्या सोयीनुसार आहेत. निधी हा शासनाचा असला तरी त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत कुठेही पालकमंत्र्यांचा उल्लेख नाही. माझ्या नावाने काम असल्यानेच आपण पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले, तेही पोलीस विभागाची ना हरकत घेऊन, असे तुषार भारतीय यांनी सांगितले. पत्रपरिषदेला उपमहापौर संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, पद्मजा कौंडिण्य, लता देशमुख, भारत चिखलकर, सविता भागवत, श्याम जोशी उपस्थित होते.राणांना एवढा माज कशाचा?माझ्या प्रभागात सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा कांगावा राणा करीत आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी या सात जणांची नावे सांगावी अन् त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे. मरणाचेही राजकारण करण्याएवढ्या पातळीवर राणा घसरले आहेत. शहरात डेंग्यूचा कहर असताना राणा मात्र दहीहंडी अन् त्यामध्ये बायांच्या ठुमक्यात व्यस्त होते. सवंग राजकारणामुळे वातावरण गढूळ झाले असल्याचे भारतीय म्हणाले.नवरा-बायकोचा पक्षस्वाभिमान ही काही दिवसांनंतर फक्त नवरा-बायकोचीच पार्टी राहणार आहे. कार्यकर्त्यांना स्वाभिमान असल्यास त्यांनी आमच्या पक्षात यावे; आमची कवाडे खुली आहेत, असे भारतीय म्हणाले. कामासंदर्भातील अवर सचिवांचे एक जरी पत्र दाखविल्यास मी राजकारण सोडेन किंवा त्यांनी सोडावे. कल्याणनगरचा रस्ता विनापरवानगी जेसीबीने खोदला. यासंदर्भात आयुक्तान्ांी पोलिसांत तक्रार न दिल्यास आम्ही देऊ, असे तुषार भारतीय म्हणाले.