शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

आठ दिवसांत पीककर्ज वाटपाचे बँकांना ‘आव्हान’

By admin | Updated: June 23, 2015 00:42 IST

खरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे.

शासनाचा दबाव : उद्दिष्टांच्या ४१ टक्केच झाले वाटप, शेतकऱ्यांची कोंडीगजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे. सद्यस्थितीत बँकांनी उद्दिष्टांच्या ४१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँका शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने शासनाने बँकांवर दबाव वाढविला असून १०० टक्के कर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ दिली आहे. परंतु बँकांची कर्जवाटपाची एकंदर प्रगती पाहता आठवडाभरात पीककर्जाचे वाटप ‘बँकांसाठी’ आव्हान ठरणार आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य असा दमदार पाऊस पडला. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांच्या खरेदीकरिता पीककर्जाची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ४९८ खातेदारांना १६९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी ७०० कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ४१ टक्के आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाच्या २० जूनच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५६३ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ६७ शेतकऱ्यांना ७४ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रासाठी ३१८ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ५७ टक्के इतके आहे. प्रक्रिया शुल्क घेऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनजिल्ह्यात ४ लाख २० हजार शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख २० हजार खातेदारांना म्हणजे फक्त ३० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही. गेल्या वर्षीच्या कर्जाची ७१ हजार शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. ३६ हजार शेतकऱ्यांचे पुनर्गठन झालेले नाही. कर्ज मंजूर करताना प्रक्रिया शुल्काची आकारणी करु नये, असे आवाहन बँकांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. सेंट्रल बँकेचे ४६ टक्के, स्टेट बँकेचे २५ टक्के वाटपजिल्ह्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ४७ शाखा आहेत. या बँकेला १८ हजार ८३३ शेतकऱ्यांना २७९ कोटी ६६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. १९ जूनपर्यंत १२७ कोटी ५८ लाख रुपयांचे वाटप या बँकेने केले आहे. ही टक्केवारी ४६ टक्के आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ५१ शाखांना ५४ हजार ३१५ शेतकऱ्यांना ३८० कोटी ९४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य आहे. या बँकेने १९ जूनपर्यंत १० हजार ५७७ शेतकऱ्यांना ९६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे प्रमाण फक्त २५ टक्के इतके आहे.