शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत पीककर्ज वाटपाचे बँकांना ‘आव्हान’

By admin | Updated: June 23, 2015 00:42 IST

खरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे.

शासनाचा दबाव : उद्दिष्टांच्या ४१ टक्केच झाले वाटप, शेतकऱ्यांची कोंडीगजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे. सद्यस्थितीत बँकांनी उद्दिष्टांच्या ४१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँका शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने शासनाने बँकांवर दबाव वाढविला असून १०० टक्के कर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ दिली आहे. परंतु बँकांची कर्जवाटपाची एकंदर प्रगती पाहता आठवडाभरात पीककर्जाचे वाटप ‘बँकांसाठी’ आव्हान ठरणार आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य असा दमदार पाऊस पडला. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांच्या खरेदीकरिता पीककर्जाची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ४९८ खातेदारांना १६९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी ७०० कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ४१ टक्के आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाच्या २० जूनच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५६३ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ६७ शेतकऱ्यांना ७४ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रासाठी ३१८ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ५७ टक्के इतके आहे. प्रक्रिया शुल्क घेऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनजिल्ह्यात ४ लाख २० हजार शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख २० हजार खातेदारांना म्हणजे फक्त ३० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही. गेल्या वर्षीच्या कर्जाची ७१ हजार शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. ३६ हजार शेतकऱ्यांचे पुनर्गठन झालेले नाही. कर्ज मंजूर करताना प्रक्रिया शुल्काची आकारणी करु नये, असे आवाहन बँकांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. सेंट्रल बँकेचे ४६ टक्के, स्टेट बँकेचे २५ टक्के वाटपजिल्ह्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ४७ शाखा आहेत. या बँकेला १८ हजार ८३३ शेतकऱ्यांना २७९ कोटी ६६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. १९ जूनपर्यंत १२७ कोटी ५८ लाख रुपयांचे वाटप या बँकेने केले आहे. ही टक्केवारी ४६ टक्के आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ५१ शाखांना ५४ हजार ३१५ शेतकऱ्यांना ३८० कोटी ९४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य आहे. या बँकेने १९ जूनपर्यंत १० हजार ५७७ शेतकऱ्यांना ९६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे प्रमाण फक्त २५ टक्के इतके आहे.