शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांची मौज बळीराजाला शिक्षा

By admin | Updated: November 23, 2015 00:22 IST

संत्रफळाचे गडगडले भाव, संत्रा कलमा विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका, संत्र्याला लागलेली गळती, ....

कापूस कवडीमोल भावात : शेतकरी हताशसुनील देशपांडे अचलपूरसंत्रफळाचे गडगडले भाव, संत्रा कलमा विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका, संत्र्याला लागलेली गळती, बागांकडे न फिरकणारा व्यापारी, सोयाबीन आणि कापूस ही हातची गेलेली पिके, इतर पिकांची नापिकी त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने तो साजरा करतो. यावर्षीही तो साजरा केला गेला. बाजारपेठेत शेतकरी दिसलाच नाही. चाकरनाम्यांची मात्र खरेदीसाठी धूम झाल्याचे चित्र होते. यावर्षी सर्वच बाजूने शेतकरी, शेतमजूर यांचा आधार तुटल्याने दिपावलीचे हे प्रकाशपर्व काळोखात गेले. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची चिन्हे जुनमध्येच सुरू झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला वादळी पावसाने पिकांना झोपवून टाकले होते. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळायचा तो संत्रा कलमाच्या व्यवसायातून. संत्रा कलमांच्या व्यवहारावर फ्लॅट खरेदी, घर बांधणी, मुलांचे उच्च शिक्षण, विवाह याशिवाय पन्हेरीच्या पैशावर अन्य मोठे व्यवहार अर्थात उसनवारी क्षणात ठरायची याशिवाय पन्हेरीच्या भरवशावर रासायनिक खते व किटकनाशकांची उधारी व्हायची. सोबत किराणा व इतर देयके, कर्ज व या गोष्टी अवलंबून असायच्या. मात्र बाजारपेठ सुरू होताच संत्रा कलमांचे बाजारभाव जबरदस्त पडले. १५ रूपये प्रति कलम येणारा खर्च तर सोडा मातीमोल भावात विक्री करूनही ५० टक्के संत्रा कलमा शेतात उभ्या राहिल्या. यात कलम उत्पादक भुईसपाट झाला. पन्हेरी व्यवसायावर अवलंबून असणारा मजूरही यात कोंडीत सापडला. परिणामी या पन्हेरीवर अवलंबून असणारे सर्व व्यवहार ठप्प झाले. यावर्षी सोयाबीन, संत्रा, कापूस या पिकांनी दगा दिला. ज्वारीच्या कणसातही अळ्या पडल्या. सोयाबीन हातचे गेले. काहींनी उभ्या सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. त्यांचा लागलेला खर्चही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एक ते दोन पोती सोयाबीन झाले त्यास शासनाने योग्य भाव न देऊन रडविले. अचलपूर, चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी इत्यादी तालुक्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सर्वच प्रकारचे खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने हिशेब जुळवायला शेतकऱ्याची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जातून मुक्त होण्याऐवजी पुन्हा कर्जबाजारी होत आहे. दुष्काळाची लाभलेली दृष्ट पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतोय. नापिकीला कंटाळून व हताश होवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत शासन दरबारी एक लाख रूपये आहे.तिही मदत पात्र शेतकऱ्यांनाच मिळत आहे.निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. शेतीमालावर आधारित उद्योगाची गरज आहे. संत्रा बागायतदारांचीही हलाखीची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांविषयी पुळका दाखविणारे पुढारी आता कुठे गेले. गेल्या १० वर्षात पाच तालुक्यात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. समोर येऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा. - राजेश उभाडसामाजिक कार्यकर्ते.