शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

चाकरमान्यांची मौज बळीराजाला शिक्षा

By admin | Updated: November 23, 2015 00:22 IST

संत्रफळाचे गडगडले भाव, संत्रा कलमा विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका, संत्र्याला लागलेली गळती, ....

कापूस कवडीमोल भावात : शेतकरी हताशसुनील देशपांडे अचलपूरसंत्रफळाचे गडगडले भाव, संत्रा कलमा विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका, संत्र्याला लागलेली गळती, बागांकडे न फिरकणारा व्यापारी, सोयाबीन आणि कापूस ही हातची गेलेली पिके, इतर पिकांची नापिकी त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने तो साजरा करतो. यावर्षीही तो साजरा केला गेला. बाजारपेठेत शेतकरी दिसलाच नाही. चाकरनाम्यांची मात्र खरेदीसाठी धूम झाल्याचे चित्र होते. यावर्षी सर्वच बाजूने शेतकरी, शेतमजूर यांचा आधार तुटल्याने दिपावलीचे हे प्रकाशपर्व काळोखात गेले. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची चिन्हे जुनमध्येच सुरू झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला वादळी पावसाने पिकांना झोपवून टाकले होते. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळायचा तो संत्रा कलमाच्या व्यवसायातून. संत्रा कलमांच्या व्यवहारावर फ्लॅट खरेदी, घर बांधणी, मुलांचे उच्च शिक्षण, विवाह याशिवाय पन्हेरीच्या पैशावर अन्य मोठे व्यवहार अर्थात उसनवारी क्षणात ठरायची याशिवाय पन्हेरीच्या भरवशावर रासायनिक खते व किटकनाशकांची उधारी व्हायची. सोबत किराणा व इतर देयके, कर्ज व या गोष्टी अवलंबून असायच्या. मात्र बाजारपेठ सुरू होताच संत्रा कलमांचे बाजारभाव जबरदस्त पडले. १५ रूपये प्रति कलम येणारा खर्च तर सोडा मातीमोल भावात विक्री करूनही ५० टक्के संत्रा कलमा शेतात उभ्या राहिल्या. यात कलम उत्पादक भुईसपाट झाला. पन्हेरी व्यवसायावर अवलंबून असणारा मजूरही यात कोंडीत सापडला. परिणामी या पन्हेरीवर अवलंबून असणारे सर्व व्यवहार ठप्प झाले. यावर्षी सोयाबीन, संत्रा, कापूस या पिकांनी दगा दिला. ज्वारीच्या कणसातही अळ्या पडल्या. सोयाबीन हातचे गेले. काहींनी उभ्या सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. त्यांचा लागलेला खर्चही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एक ते दोन पोती सोयाबीन झाले त्यास शासनाने योग्य भाव न देऊन रडविले. अचलपूर, चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी इत्यादी तालुक्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सर्वच प्रकारचे खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने हिशेब जुळवायला शेतकऱ्याची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जातून मुक्त होण्याऐवजी पुन्हा कर्जबाजारी होत आहे. दुष्काळाची लाभलेली दृष्ट पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतोय. नापिकीला कंटाळून व हताश होवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत शासन दरबारी एक लाख रूपये आहे.तिही मदत पात्र शेतकऱ्यांनाच मिळत आहे.निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. शेतीमालावर आधारित उद्योगाची गरज आहे. संत्रा बागायतदारांचीही हलाखीची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांविषयी पुळका दाखविणारे पुढारी आता कुठे गेले. गेल्या १० वर्षात पाच तालुक्यात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. समोर येऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा. - राजेश उभाडसामाजिक कार्यकर्ते.