शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सीईओंचा ‘टाईम बाऊंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:30 IST

जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : संचिकांचा निपटारा वेळेत करा

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.फायलींचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा असावी व अनावश्यक फेऱ्या थांबाव्यात, यासाठी अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आग्रही आहेत. सर्वसाधारण स्थायी सभांतून अनेकदा मागणीही करण्यात आली. संचिकेस विलंब होत असल्याचे काही महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी फाइल कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किती दिवस असावी आणि किती दिवसांत तिचा निपटारा करावा, याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. याचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना नोटीसद्वारे कळविणार आहे. कायदा शासन निर्णय व नियमांचा संदर्भ देत संचिका पुढे पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विलंब करणाºयांवर दिरंगाईची कारवाई केली जाणार आहे.आठवड्यात निर्णयसंचिकेवर कनिष्ठ सहायकांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा. वरिष्ठ सहायकांनी दोन दिवस, कनिष्ठ किंवा सहायक प्रशासन अधिकाºयांनी एक दिवस, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आणि खातेप्रमुखांनी दोन दिवसांत फाइल पुढे पाठवावे. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागालाही हा निर्णय लागू असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.नागरिकांची सनद हवीनव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याने कामाला गती मिळाली आहे. त्यांना सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमी सहकार्य राहील. संचिका वेळेत निकाली काढण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. आता प्रत्येक विभागात नागरिकांची सनदही लावण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने विहित मुदतीत आवश्यक कारवाई करावी. कारण नसताना त्या पेंडिंग ठेवू नये. दप्तरदिरंगाई केल्यास सदर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषद