शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

सीईओंचा ‘टाईम बाऊंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:30 IST

जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : संचिकांचा निपटारा वेळेत करा

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.फायलींचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा असावी व अनावश्यक फेऱ्या थांबाव्यात, यासाठी अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आग्रही आहेत. सर्वसाधारण स्थायी सभांतून अनेकदा मागणीही करण्यात आली. संचिकेस विलंब होत असल्याचे काही महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी फाइल कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किती दिवस असावी आणि किती दिवसांत तिचा निपटारा करावा, याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. याचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना नोटीसद्वारे कळविणार आहे. कायदा शासन निर्णय व नियमांचा संदर्भ देत संचिका पुढे पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विलंब करणाºयांवर दिरंगाईची कारवाई केली जाणार आहे.आठवड्यात निर्णयसंचिकेवर कनिष्ठ सहायकांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा. वरिष्ठ सहायकांनी दोन दिवस, कनिष्ठ किंवा सहायक प्रशासन अधिकाºयांनी एक दिवस, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आणि खातेप्रमुखांनी दोन दिवसांत फाइल पुढे पाठवावे. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागालाही हा निर्णय लागू असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.नागरिकांची सनद हवीनव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याने कामाला गती मिळाली आहे. त्यांना सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमी सहकार्य राहील. संचिका वेळेत निकाली काढण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. आता प्रत्येक विभागात नागरिकांची सनदही लावण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने विहित मुदतीत आवश्यक कारवाई करावी. कारण नसताना त्या पेंडिंग ठेवू नये. दप्तरदिरंगाई केल्यास सदर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषद