शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सेंट्रल बॅँकेने हिरावला ४०० शेतकऱ्यांचा पीकविमा

By admin | Updated: March 31, 2016 00:17 IST

सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला.

शेतकरी धडकले : साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन अमरावती : सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला. दुष्काळीस्थिति असल्याने पीकविमा मंजूर झाला. मात्र, शेतकऱ्यांचा विमाहप्ता बॅँकेने रिजनल शाखेकडे पाठविलाच नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पीकविमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बुधवारी माजी आमदार साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयात धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. नेरपिंगळाई येथील ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बॅँक शाखेत रोखीने व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या रकमेमधून पीकविमा काढला. इतर बॅँकांद्वारा शेतकऱ्यांना मागील वर्षाचा विमा मिळाला. मात्र, सेंट्रल बॅँकेच्या व्यवस्थापकांनी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा वाटा अकोला येथील रिजनल आॅफिसमध्ये पाठविला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची रकम मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी २२ आॅगस्ट आणि १६ नोव्हेंबरला निवेदन दिले असता व्यवस्थापकाने शेतकऱ्यांच्या नावाची खोटी तक्रार दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी उपोषण केले असता बॅँकेद्वारा ९० दिवसात पीकविम्याची रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, ही मुदत देखील उलटून गेली आहे. त्यामुळे बॅँक व्यवस्थापनावर कारवाई करुन पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश कनेर, पद्माकर वाकोडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.