शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सीबीएसई दहावीत ‘अंकिता’ चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:40 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी अडीच वाजता सीबीएसई संकेत स्थळावर जाहीर झाला. शहरातील आठ शाळांमधून स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता ज्योतिकुमार कनोजी हिने सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चमक दाखवली.

ठळक मुद्देघवघवीत यश : आठ शाळांचा निकाल १०० टक्के, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी अडीच वाजता सीबीएसई संकेत स्थळावर जाहीर झाला. शहरातील आठ शाळांमधून स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता ज्योतिकुमार कनोजी हिने सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चमक दाखवली.शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, स्कॉलर्स कॉन्व्हेंट, इंडो पब्लिक स्कूल, महर्षी पब्लिक स्कूल, पी.आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल, पोदार स्कूल, अभ्यासा इंटरनॅशनल, विश्वभारती पब्लिक स्कूल अशा आठ सीबीएसई शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावीची परीक्षा ३ मार्च रोजी प्रारंभ झाली आणि २५ मार्च रोजी संपली. ६ मे रोजी संकेतस्थळावर आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर संकेत स्थळावर निकाल पाहण्यासाठी शाळांसह विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.संकेतस्थळ हँग न होता निकाल सुरळीत बघता आला. शहरातील सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.असा आहे शाळानिहाय निकालशहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता कनोजी हिने ९८ टक्के गुण पटावित सीबीएसई परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. मानव काळमेघ याने ९७.४ टक्के, पार्थ देशमुख ९७.४, रजत धुमाळ ९७.४, पीयूष गावंडे ९६.२, शरयू अडकणे ९६.२, तर कुशाल मेहता याने ९६ टक्के गुण पटकावले.स्कॉलर्स कॉन्व्हेंटचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अंजली राठी हिने ९६.८ टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. कृष्णा सोमाणी याने ९४.८ टक्के, सिद्धी लिखमानी ९४.४, शंतनू मेटी ९२ टक्के, भागश्री टेकाडे ८८.८ टक्के, तर अंकित गावंडे याने ८७.६ टक्के गुण मिळविले आहेत.विश्वभारती पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. कौस्तुभ वाघमारे याने ९२.८ टक्के गुण मिळवित शाळेतून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला. अथर्व राणे याने ९०.८ टक्के, तर साकेत वावरे याने ९० टक्के गुण मिळवले. शाळेतून २० विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.महर्षी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यात दिग्विजय वाघ, अनुराधा चोपडे, धर्मेश पंचारिया, गुंजन भुगूल, मोनल बारसे, इरम अली, तनिश आचार्य, प्रेम वंजारी, अदिरी अंबाडकर, वीर गडलिंग, अर्थव जाधव, आकांक्षा भगत यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे.एडिफाय स्कूलनेही निकालात बाजी मारली. यात अर्पित बिजवे याने ९२.६ टक्के, तनिष्का टाकसाळे ९२ तर आदित्य काळे याने ९१.२ टक्के गुण मिळवले. शाळेचे २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अभ्यासा इंग्लिश स्कूलचे ३९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. शाळेचा १०० टक्के निकाल लागला. तन्वी अनिल देशमुख (९७), निखिल धनंजय खाडे (९५), श्रावणी अमित धांडे (९४), प्रीती राजकुमार कटिया (९३), सई हेमंत लांडगे (९३), सुमीत अरविंद धस्कट (९३), आयुष दिनेश किरक्टे (९३), वेदांत पुंडलिक वानखडे (९३), अनन्या सुनील लोंढे (९३), समृद्धी गोपाल लढ्ढा (९३), पार्थ किशोर इंगळे (९२), सम्यक रवींद्र तिखाडे (९०), हर्षल श्रवण पवार (९०) यांनी गुणवंतांच्या यादी स्थान मिळविले.पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला ७१ विद्यार्थी बसले होते. यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रशब्दी आठवले हिने ९६.२० टक्के, निधी गिरी ९६ टक्के, ईशान जयस्वाल ९५.४, इशा पालेकर ९४.६, यश कडू ९४.४, आकांक्षा फुटाणे ९४.४, यश सारडा ९४ टक्के, ऋषभ सारडा ९३.६, रिया शहा ९३.४, समृद्धी खोडे ९३.४, अनुश्री घटाले ९३ टक्के, सेजल फुसे ९०.४, निकिता शिरस्कार हिने ८९.४ टक्के गुण मिळवले.पोदार इंटरनॅशनल स्कूलने निकालात बाजी मारली. ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क््यांपेक्षा जास्त गुण मिळविले. पहिल्या दहामध्ये आर्यन खेडकर (९७ टक्के), आदर्श चौधरी (९७), प्रसाद केळकर (९६.६), सृजन संगई (९६.४), कार्तिक कुंजेकर (९५.८), अथर्व गावंडे (९५.८), निकिता हिंडोचा (९५.४), यश दोशी (९५.२), छवी बजाज (९५), आशय ठाकरे (९४.८), प्रशील टिपरे (९४.८) आहेत.अंकिताची आयआयटीमध्ये जाण्याची मनीषासीबीएसई दहावीच्या परीक्षेत शहरातील शाळांमधून अव्वल आलेल्या अंकिता कनोजी हिला आयआयटीतून इंजिनीअरिंग करायचे आहे, असे तिचे वडील ज्योतीकुमार कनोजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोमवारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला तेव्हा ती हैद्राबाद येथे कॅम्पसमध्ये होती. ज्योतीकुमार कनोजी यांनी लष्करात १९८० ते १९९७ या काळात सेवा दिली. आई मीरा या गृहिणी आहेत. अंकिताला अभियांत्रिकीच्या माध्यमातून देशसेवा करायची आहे.