शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

कपाशीवर आकस्मिक ‘मर’

By admin | Updated: October 7, 2016 00:34 IST

यंदा पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने सायाबीनचे पीक उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने बाधित झाले आहे.

पांढरे सोने बाधित : बोंडअळी, पांढरी माशी, पातेगळने नुकसानअमरावती : यंदा पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने सायाबीनचे पीक उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. ठिकठिकाणी बीटी कपाशीवर ‘मर’ (पॅराविल्ट) दोन आहेत. तर प्रतिकुल पावसामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशिवर बोंडअही, पांढरी माशी, मिलीबग सोबतच पातेगळ होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यात यंदा कपाशीचे एक लाख ९३ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत एक लाख ८१ हजार ३९२ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली. पेरणीपासून दीड महिना कपाशीला पोषक व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे कपाशी पिकांची अधिक वाढ झाली. नंतर ७ आॅगस्टपासून पावसाचा ३५ दिवस खंड राहिला. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीला पाणी देणे सुरू केले. मात्र, १५ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू झाला. तीन आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात, जमिनीत आर्द्रता वाढली व सूर्यप्रकाशाचा अभाव, सतत ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. ठिकठिकाणी कपाशीवर आकस्मिक ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले आहे. प्रतिकूल वातावरणामुळे कपाशीची पातेगळ होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी विभाग, डॉ.पंजाबराव देशामुख कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी अनुसंधान केंद्राच्या अधिकारी व शास्त्रज्ञांनी जिल्ह्याच्या अनेक भागात दौरा करून हे निरीक्षण नोंदविले आहे. कपाशीवर मर, पातेगळ, पांढरी माशी, तुडतुडे व फुल किड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे.कपाशीच्या पानातील रस शोषण केल्यामुळे पाने कोकडून जाऊन झाडे लाल होत आहे. अतिपावसामुळे काही ठिकाणी कपाशीची झाडे सुकून जात आहे. जिल्ह्यात अंजनगाव तालुक्यात १२ हजार ७८ हेक्टर, अचलपूर १६ हजार २३७, चांदूरबाजार १८ हजार ९५०, धामणगाव २० हजार ३६१, धारणी ६ हजार ७२०, चिखलदरा ७३१, अमरावती ६ हजार ९६८, भातकुली ५ हजार ५२३, नांदगाव खंडेश्वर ३ हजार ६४३, चांदूररेल्वे ६ हजार ११८, तिवसा १३ हजार ८३१, मोर्शी २२ हजार २५३, वरुड २६ हजार ७१७ व दर्यापूर तालुक्यात १७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रात कपाशी आहे. (प्रतिनिधी)