शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर आकस्मिक ‘मर’

By admin | Updated: October 7, 2016 00:34 IST

यंदा पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने सायाबीनचे पीक उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने बाधित झाले आहे.

पांढरे सोने बाधित : बोंडअळी, पांढरी माशी, पातेगळने नुकसानअमरावती : यंदा पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने सायाबीनचे पीक उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. ठिकठिकाणी बीटी कपाशीवर ‘मर’ (पॅराविल्ट) दोन आहेत. तर प्रतिकुल पावसामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशिवर बोंडअही, पांढरी माशी, मिलीबग सोबतच पातेगळ होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यात यंदा कपाशीचे एक लाख ९३ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत एक लाख ८१ हजार ३९२ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली. पेरणीपासून दीड महिना कपाशीला पोषक व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे कपाशी पिकांची अधिक वाढ झाली. नंतर ७ आॅगस्टपासून पावसाचा ३५ दिवस खंड राहिला. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीला पाणी देणे सुरू केले. मात्र, १५ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू झाला. तीन आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात, जमिनीत आर्द्रता वाढली व सूर्यप्रकाशाचा अभाव, सतत ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. ठिकठिकाणी कपाशीवर आकस्मिक ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले आहे. प्रतिकूल वातावरणामुळे कपाशीची पातेगळ होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी विभाग, डॉ.पंजाबराव देशामुख कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी अनुसंधान केंद्राच्या अधिकारी व शास्त्रज्ञांनी जिल्ह्याच्या अनेक भागात दौरा करून हे निरीक्षण नोंदविले आहे. कपाशीवर मर, पातेगळ, पांढरी माशी, तुडतुडे व फुल किड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे.कपाशीच्या पानातील रस शोषण केल्यामुळे पाने कोकडून जाऊन झाडे लाल होत आहे. अतिपावसामुळे काही ठिकाणी कपाशीची झाडे सुकून जात आहे. जिल्ह्यात अंजनगाव तालुक्यात १२ हजार ७८ हेक्टर, अचलपूर १६ हजार २३७, चांदूरबाजार १८ हजार ९५०, धामणगाव २० हजार ३६१, धारणी ६ हजार ७२०, चिखलदरा ७३१, अमरावती ६ हजार ९६८, भातकुली ५ हजार ५२३, नांदगाव खंडेश्वर ३ हजार ६४३, चांदूररेल्वे ६ हजार ११८, तिवसा १३ हजार ८३१, मोर्शी २२ हजार २५३, वरुड २६ हजार ७१७ व दर्यापूर तालुक्यात १७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रात कपाशी आहे. (प्रतिनिधी)