शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सुतार व्यवसाय काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

विज्ञान आणि प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्रांचा वापर वाढला. बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने शेतकरी होत आहेत. परिणामी ...

विज्ञान आणि प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्रांचा वापर वाढला. बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने शेतकरी होत आहेत. परिणामी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या सुतार समाजावर उतरती कळा आल्याचे ग्रामीण भागात दिसते.

मृग नक्षत्र सुरुवात होताच ग्रामीण भागातील शेतकरी सुताराकडे गर्दी करायचा. कुणाला तिफन, वखर, किंवा काकरी शेतकरी बनवत होता. सुतारकाम करणारे कारागीर मोजकेच असल्याने शेतकऱ्यांना त्या कारागिराची मनधरणी करावी लागत होती. परंतु लाकडी साहित्याची जागा लोखंडी अवजाराने घेतल्याने याचा परिणाम सुतार कारागिराला झाल्याचे दिसते आहे.

एखादे वखर किंवा अन्य कोणतेही शेती उपयोगी साहित्य बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे लाकूड शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसातच सुतार कारागिराकडे घेऊन जात होते. त्याला कारागीर योग्य आकार देऊन साहित्य बनवत होता. आता मात्र याची जागा लोखंडी साहित्याने घेतल्यामुळे शेती उपयोगी लाकडी साहित्य काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र एकंदरीत ग्रामीण भागात तरी सध्या दिसत आहे.

काही वर्षापूर्वी प्रत्येक शेतकरी शेतात तिफनचा वापर पेरणीसाठी करीत होता. आता मात्र तिफनची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने पेरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने होऊ लागल्याने काळ्या मातीत चालणारी तिफनसुद्धा काळाच्या पडद्याआड गेली आहे.

येणाऱ्या पिढीला शेतीतील लाकडी अवजारांचा शेतकरी उपयोग करत होता, हे मात्र चित्र पुस्तकातूनच पाहायला मिळतील काय, असे दिसत आहे.

पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सुतार कारागिराचा विशिष्ट जेथे राहायचे त्या ठिकाणाला ग्रामीण भागात ‘कामठा‘ हा शब्द प्रचलित होता. आता तो कामठा काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामीण भागातील शेतकरीही त्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुतार कारागीर काम करणारे नवीन कारागीर सुद्धा तयार होत नाही कारण विज्ञानाने प्रगती केल्याने ही समस्या ही मोठी निर्माण झाली असल्याने कारागीरसुद्धा दिसेनासे झाले आहे.