पान २ ची बॉटम
चांदूर बाजार : तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ४१ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ११ ते १६ फेब्रुवारी रोजी दरम्यान ग्रामपंचायतनिहात विशेष सभा घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गावातील राजकारण तापले आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये कुण्या एका पॅनेलला बहुमत मिळाले, तेथे त्यांच्याकडे आरक्षित संवर्गाचा सदस्य असल्यास सरपंचपदाची निवड विनासायास होईल. मात्र, ज्या ठिकाणी कुण्या एका गटाला स्पष्ट बहुमत नाही, तेथे सरपंच आरक्षण असलेल्या संवर्गातील सदस्याला आपल्याकडे खेचण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.
सरपंचपदासाठी उमेदवारांची पळवापळवी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याकरिता सदस्यांना प्रलोभने, आश्वासनाची खैरात वाटली जात आहे. चांदूर बाजार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कुठेच अनुचित प्रकार घडला नाही. तर नुकतीच आरक्षण सोडत संपन्न झाली असून अनेक गावपुढाऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले. सत्तास्थापनेसाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या आठवड्यात तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवड होईल. यामुळे अनेक ठिकाणी मोचेर्बांधणी सुरू असून 'काही तळ्यात काही मळ्यात' असे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी उमेदवार अनेकांना भूलथापा देत असल्याने त्यांना पर्यटनस्थळी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सत्तासपनेसाठी अनेक नवख्या सदस्यांची सध्या मेजवानी सुरू झाली आहे.
रिमोटसाठी प्रयत्न
अनेक ठिकाणी पॅनेलप्रमुखांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरिही सत्तेचा रिमोट आपल्याच हाती असावा, यासाठी पॅनेलप्रमुख व गावपुढाºयांनी ‘सरपंचपदाचा सदस्य आणतोच’ अशी शेखी मिरवणी सुरू केले आहे. निवडून आलेल्या अनेक सदस्यांना गावपुढारी व राजकीय नेतेमंडळीतर्फे पैसे व रोजगाराचे प्रलोभने दिली जात आहेत. तर काहींना पदाचे आश्वासने सुद्धा दिली जात आहे.