शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता

By admin | Updated: February 10, 2017 00:13 IST

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे.

फ्लेक्सकडे लक्ष : संपदेतून जाहीर होणार समाजसेवा अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय चांगला ठरणारा आहे. राजकीय पक्षाने किती उमेदवार दिले ही माहिती सहजतेने उपलब्ध होईल. मात्र प्रतीज्ञा पत्रात उमेदवारांनी जाहीर केलेली स्थावर व जंगम मालमत्ता किती? याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारांना मालमत्तेची माहिती प्रतीज्ञा पत्राद्वारे अनिवार्य केलीे आहे. यात उमेदवारांकडे किती ‘लक्ष्मी’ आहे, हे जाहीर होणार आहे. याच ३ बाय ४ फूट आकार असलेल्या फ्लेक्सच्या आधारे रिंगणातील उमेदवार आमने- सामने येणार आहेत. प्रचारात स्थावर व जंगम मालमत्तेचा मुद्दा उपस्थित करुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होणार आहे. आयोगाने नियम व कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रियेला वळण लावले आहे. अलिकडे राबविली जाणारी आदर्श आचार संहिता ही भयमुक्त निवडणुकांसाठी लाभदायक ठरणारी आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती प्रतीज्ञा पत्राच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय मतदारांसाठी जनजागृती करणारा आहे. गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणून लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राजकीय पक्ष अथवा आघाड्या उमेदवारी देताना वेगळे निकष लावते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा राजकारणात सहजतेने प्रवेश होते. मात्र आयोगाने राबविलेली ही संकल्पना निश्चित बदल करणारी ठरेल. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कोण उमेदवार रिंगणात हे स्पष्ट झाले आहे. गडगंज घरातील व्यक्तींचेही राजकारणाच्या दिशेने पावले पडू लागली आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रतीज्ञा पत्रात जाहीर केलेल्या संपत्तीची विवरणपत्रे पाहिले तर स्थावर व जंगल मालमत्तेबाबत अनेक बाबी स्पष्ट होतील. सदृढ लोकशाहीसाठी चांगल्या प्रतिमेच्या उमेदवार असणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेला उमेदवार नको, असे अभिप्रेत आहे. मात्र अमूक पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसरा पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांना उमेदवारी बहाल करतात, असे चित्र आहे. ही बाब समाजसाठी घातक ठरणारी आहे.