शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

लोकवर्गणीची अट रद्द, ग्रामपंचायतींना दिलासा

By admin | Updated: August 3, 2014 23:05 IST

ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी ठेवण्यात आलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना

पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी : वेळेत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्टअमरावती : ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी ठेवण्यात आलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीस गती मिळाली आहे. ग्रामपंचायती अंतर्गत गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. योजनेतील लोकसहभागासाठी दहा टक्के लोकवर्गणी जमा करण्याची अट होती परंतु योजनांच्या कामाच्या किमती पाहता तसेच ग्रामस्थांकडून लोकवर्गणी गोळा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाच्या नियोजित निधी दिला जातो. परंतु बहुतांश पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीअभावी निष्फळ झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे लोकवर्गणीची अट पूर्णत: रद्द करून ठराविक कालावधीत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. यापूर्वी ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची रक्कम जमा करण्यात आली ती स्थानिक स्वराज्य संस्था अथवा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस परत केली जाणार नाही; तथापी अशा पाणीपुरवठा योजनांमधील उर्वरित लोकवर्गणीची तरतूद पाणीपुरवठा योजनांच्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे नियोजन अंमलबजावणी देखभाल दुरूस्ती या तीनही भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग येत असल्यामुळे शासनाने लोकसहभागाचे धोरण अबाधित ठेवले आहे. लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीस गती येणार आहे. गरजू गावांनी पाणी पुरवठा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)