शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

विद्यापीठस्तरीय हिवाळी परीक्षा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

अमरावती : कोविडने नवे रूप धारण केले आहे. उन्हाळी २०२० या अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकालाचा घोळ अजुनही संपला ...

अमरावती : कोविडने नवे रूप धारण केले आहे. उन्हाळी २०२० या अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकालाचा घोळ अजुनही संपला नाही. अशातच हिवाळी २०२० परीक्षा घेणे हे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक विचार करून हिवाळी २०२० ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्या परिषदेचे सदस्य प्राचार्य आर.डी. सिकची यांनी केली आहे.

कुलगुरू मुरलीधर चांंदेकर यांना २२ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रानुसार, प्राचार्य सिकची यांनी उन्हाळी २०२० परीक्षेत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थांची मानसिकता विशद केली आहे. यंदा एकूण सहा परीक्षांचे नियोजन परीक्षा विभागाने केले आहे. त्यामुळे आताच हिवाळी परीक्षांचे नियाेजन केल्यास अधिकारी, कर्मचारी वैतागून जातील, असे सिकची यांचे म्हणने आहे. हिवाळी २०२० मध्ये होऊ घातलेल्या पदवी परीक्षांच्या सत्र १, सत्र ३ व सत्र ५ आणि पदव्यु्तर पदवी परीक्षेच्या सत्र १ व सत्र ३ आदी (नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या) परीक्षा फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू होऊ शकणार नाही, असे चित्र आहे. दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण अद्यापही सुरू झाले नाही. शैक्षणिक सत्र सुरू होणे आणि प्रत्यक्षात शिक्षण सुरू होणे यात मोठा फरक आहे. कोरोना पूर्णत: गेलेला नाही. संकट कायम आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षा घेऊ नये, असे प्राचार्य सिकची यांची मागणी आहे.

---------------------

बॉक्स

असे करावे परीक्षेचे नियोजन

शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ हे नियमित सुरू व्हावे, यासाठी हिवाळी २०२० परीक्षेतील पदवी परीक्षेचे सत्र १ व सत्र ३, सत्र ५ आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेचे सत्र १ व सत्र ३ या परीक्षा पूर्णत: रद्द कराव्यात. त्याऐवजी उन्हाळी २०२१ मध्ये सरळ पदवी परीक्षेचे सत्र २ व सत्र ४, सत्र ६ आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या सत्र २ व सत्र ४ च्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात वाजवी कपात करुन परीक्षांचे नियोजन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिकची यांची आहे.