शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीबाबत संयुक्त बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:09 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेवकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे केली.शहरात बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. शहरात चार ते पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. कामाचे नियोजन नसल्याने कामे केव्हाही बंद अन् सुरू करण्यात येतात. महावितरण व मजीप्राच्या कामांचीही हीच स्थिती आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी राहत नाही. केबल टाकण्यासाठी केव्हाही चांगले रस्ते फोडण्यात येत आहेत. कोणत्याही यंत्रणेचा कोनाशी ताळमेळ नाही. एका विभागास विचारणा केली तर दुसºया विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येतो. यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने यासर्व विभागाची संयुक्त बैठक बोलावून कामांचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, अन्यथा काँग्रेस पक्षाद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, मनोज भेले, प्रशांत डवरे, शोभा शिंद, योगेश गावंडे, सुनील इंगोले, शरद ठोसरे, अनिल वनवे, आकाश सोनटक्के, अनिल काळे, उमेश ठाकरे, देवचंद शेंडे, आकाश मानकर, रवींद्र धानोरकर, निलेश शर्मा, बबलू दुबे आदी उपस्थित होते.पोलिसांचे वाहतुकीकडे कमी, वसुलीकडे अधिक लक्षशहरातील वाहतूक शिपायांचे वाहतुकीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष असून, केवळ वसुलीकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे जीवघेणी वाहतूक बोकाळली व लहान-मोठे अपघात होत आहेत. कामावर कंत्राटदारांची मनमानी आहे. मोठे कंत्राटदार ऐकत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. नियोजनाअभावी कंत्राटदारांनी शहरात धिंगाणा घातला आहे. एक विभाग केवळ दुसºया विभागाकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे. यासाठी या सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन ठरविणे महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.