शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

वाहतूक कोंडीबाबत संयुक्त बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:09 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेवकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे केली.शहरात बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. शहरात चार ते पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. कामाचे नियोजन नसल्याने कामे केव्हाही बंद अन् सुरू करण्यात येतात. महावितरण व मजीप्राच्या कामांचीही हीच स्थिती आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी राहत नाही. केबल टाकण्यासाठी केव्हाही चांगले रस्ते फोडण्यात येत आहेत. कोणत्याही यंत्रणेचा कोनाशी ताळमेळ नाही. एका विभागास विचारणा केली तर दुसºया विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येतो. यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने यासर्व विभागाची संयुक्त बैठक बोलावून कामांचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, अन्यथा काँग्रेस पक्षाद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, मनोज भेले, प्रशांत डवरे, शोभा शिंद, योगेश गावंडे, सुनील इंगोले, शरद ठोसरे, अनिल वनवे, आकाश सोनटक्के, अनिल काळे, उमेश ठाकरे, देवचंद शेंडे, आकाश मानकर, रवींद्र धानोरकर, निलेश शर्मा, बबलू दुबे आदी उपस्थित होते.पोलिसांचे वाहतुकीकडे कमी, वसुलीकडे अधिक लक्षशहरातील वाहतूक शिपायांचे वाहतुकीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष असून, केवळ वसुलीकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे जीवघेणी वाहतूक बोकाळली व लहान-मोठे अपघात होत आहेत. कामावर कंत्राटदारांची मनमानी आहे. मोठे कंत्राटदार ऐकत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. नियोजनाअभावी कंत्राटदारांनी शहरात धिंगाणा घातला आहे. एक विभाग केवळ दुसºया विभागाकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे. यासाठी या सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन ठरविणे महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.