शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वाहतूक कोंडीबाबत संयुक्त बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:09 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेवकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे केली.शहरात बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. शहरात चार ते पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. कामाचे नियोजन नसल्याने कामे केव्हाही बंद अन् सुरू करण्यात येतात. महावितरण व मजीप्राच्या कामांचीही हीच स्थिती आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी राहत नाही. केबल टाकण्यासाठी केव्हाही चांगले रस्ते फोडण्यात येत आहेत. कोणत्याही यंत्रणेचा कोनाशी ताळमेळ नाही. एका विभागास विचारणा केली तर दुसºया विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येतो. यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने यासर्व विभागाची संयुक्त बैठक बोलावून कामांचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, अन्यथा काँग्रेस पक्षाद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, मनोज भेले, प्रशांत डवरे, शोभा शिंद, योगेश गावंडे, सुनील इंगोले, शरद ठोसरे, अनिल वनवे, आकाश सोनटक्के, अनिल काळे, उमेश ठाकरे, देवचंद शेंडे, आकाश मानकर, रवींद्र धानोरकर, निलेश शर्मा, बबलू दुबे आदी उपस्थित होते.पोलिसांचे वाहतुकीकडे कमी, वसुलीकडे अधिक लक्षशहरातील वाहतूक शिपायांचे वाहतुकीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष असून, केवळ वसुलीकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे जीवघेणी वाहतूक बोकाळली व लहान-मोठे अपघात होत आहेत. कामावर कंत्राटदारांची मनमानी आहे. मोठे कंत्राटदार ऐकत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. नियोजनाअभावी कंत्राटदारांनी शहरात धिंगाणा घातला आहे. एक विभाग केवळ दुसºया विभागाकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे. यासाठी या सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन ठरविणे महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.