शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सरपंच पदाच्या आरक्षणावर सत्तेची गणिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

अमरावती: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम ...

अमरावती: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. परंतु जाहीर झालेल्या आरक्षणाचे सदस्य बहुमताच्या आघाडीकडे की अल्पमतातील विरोधकांकडे आहे. त्यावर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सत्तेची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेते मंडळींसह इच्छुकांची धावपळ वाढली आहे, अशाच आरक्षण सोडतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या निवडणुकीत मतदारांनी एकहाती सत्ता सोपवली नसल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पूर्ण बहुमत असलेली गावे कमी प्रमाणात आहेत. अशा गावांमध्ये कोणतेही आरक्षण पडल्यास सत्तारुढ गटाचा कोणताच तोटा होणार नाही. परंतु मतदारांनी निवडणुकीतील वेगवेगळ्या गटांमधील उमेदवारांना निवडून दिले असेल तर मात्र आरक्षण काय पडण्याची चिंता स्थानिक नेतेमंडळींना सतावू लागली आहे. बहुमत असलेले आघाडीतील सदस्य जर सरपंच आरक्षणाचा सदस्य नसेल तर पंचाईत होणार आहे. त्यामुळे बहुमत असूनही उपसरपंच पदावर समाधान मानून पाच वर्षे कारभार हाकावा लागणार आहे. अशा ठिकाणी अल्पमतात असलेल्या आघाडीतील सदस्यांचे नशीब फळफळणार आहे. या विचित्र राजकीय परिस्थितीच्या गावांमध्ये सत्तेची गणिते बिघडणार असून, मतदारांनी पाठवलेल्या सत्तारूढ गटाला महिनाभरातच विरोधकांच्या भूमिकेत जावे लागण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ग्रामपंचायतींमध्ये काठावर बहुमत तर काही ठिकाणी त्रिशंकू चित्र आहे, अशा ठिकाणी सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधातील सदस्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही गावात दोन पॅनलचे समान बलाबल असून, तिसऱ्या पॅनलमधील विजय झालेले सदस्य तेथील सत्ता ठरवणार आहेत. त्यासाठी एका आघाडीकडून दिलेली ऑफर धुडकावून दुसऱ्या पॅनेलमध्ये दाखल करून घेण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मतदारांनी व्यक्तिमत्त्वावर उमेदवारांना निवडले आहे. परिणामी गावात रिंगणात असलेल्या सर्व पॅनलमधून असे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असून, सदस्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

बॉक्स

अपक्षांना अच्छे दिन

ग्रामपंचायतीची निवडणूकही स्थानिक गटातटात झाली आहे. आता निकाल झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंचपदाकडे लागल्या आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काहीजण अपक्षांच्या भरोशावर आहेत. त्यामुळे या पक्षांच्या बाजूने आरक्षण पडल्यास कोणतेही बहुमत नसताना सरपंच पदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार आपल्याकडे आला पाहिजे, यासाठी गावागावात हालचालींना वेग आला आहे.