शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दोन वर्षांपासून रखडली सौर कंदील खरेदी

By admin | Updated: January 7, 2015 22:45 IST

जिल्हा परिषदेंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणारी सौर कंदील योजना सध्या लालफितशाहीत अडकली आहे. त्यामुळे ६० लक्ष रुपयांचा निधी मार्चपर्यंत खर्च होणार की नाही?,

अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणारी सौर कंदील योजना सध्या लालफितशाहीत अडकली आहे. त्यामुळे ६० लक्ष रुपयांचा निधी मार्चपर्यंत खर्च होणार की नाही?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासनाने सौर कंदील खरेदीसाठी औरंगाबाद येथील एकाच खासगी कंपनीशी करार केल्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या एकल धोरणामुळे हतबल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी जिल्हा निधीतून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर सौर कंदील पुरविण्यात येतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून तरतूद केल्यानंतर राज्य शासनाने सौर कंदील खरेदीसाठी ज्या कंपनीशी करार केला आहे, त्या कंपनीकडून दर्जेदार सौर कंदीलांचा पुरवठा केला जात नाही. परिणामी जि.प.ने दोन वर्षांपासून ६० लक्ष रुपयांची तरतूद केल्यानंतरही केवळ एकाच कंपनीसोबत करार असल्यामुळे सौर कंदील खरेदी करण्यास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उत्सुक नाहीत.परिणामी समाधानकारक सौर कंदीलांचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढतो आहे. शासनाने वरिष्ठ पातळीवरुन साहित्य खरेदीसाठी एकाच कंपनीची निवड केल्यामुळे सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मधील जिल्हा परिषदेतील सौर कंदीलांची सुमारे ६० लाख रुपयांची खरेदी लालफितशाही अडकून पडली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना आर्थिक वर्ष संपत आले असतानाही पदरात पाडून घेता येत नाही. या संदर्भात जि.प.चे माजी कृषी सभापती महेंद्र गैलवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना जि.प.मार्फत साहित्य पुरवठा करायचा असेल तर नवीन धोरण ठरविण्यासंदर्भात अध्यक्षांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यामुळे आता १४ जानेवारी रोजी जि.प.च्या विशेष सर्वसाधारण सभेत या मुद्यावर सभागृह काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)