शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

उदखेड येथे दोन एकरांतील गहू जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

मोर्शी : लगतच्या उदखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात अचानक आग लागून दोन एकरांतील गहू जळून खाक झाला. यात ...

मोर्शी : लगतच्या उदखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात अचानक आग लागून दोन एकरांतील गहू जळून खाक झाला. यात जवळपास दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघड झाली.

उदखेड येथील शेतकरी बाळू पंजाबराव ठाकरे यांचे उदखेड शेतशिवारात अडीच एकर शेत असून, त्यांच्या शेतात महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा खांब आहे. या खांबावरूनच समोर उच्चदाबाची वाहिनी गेली आहे. १ एप्रिल रोजी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे त्यांच्या शेतातील तारेच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्कीट होऊन त्यांनी पेरलेला दोन एकरांतील गहू पूर्णत: आगीत जळून भस्मसात झाला. तद्वतच शेतात टाकलेले स्प्रिंकलर पाईप तसेच बाशे व शेतातील काही संत्राझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ३ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे बाळू ठाकरे सकाळी शेतात गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लगेच गाव गाठून या प्रकाराची माहिती गावातील नागरिकांना दिली. अशोक ठाकरे यांनी ही माहिती दूरध्वनीवरून महावितरण, कृषी व महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिली. कार्यकारी अभियंता रहाटे व तलाठी आमझरे यांनी पंचनामा केला.

---------