शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

स्मशानभूमीतील दफन केलेले अर्भक गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:24 IST

गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्तामुळे घटना उघड : पित्याची राजापेठ पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गर्भपातामुळे दगावलेले साडेचार महिन्यांचे नवजात हिंदू स्मशानभूमीलगत असलेल्या दफनभूमीत गत महिन्यात पुरले होते. अवघ्या तीन आठवड्यांत हे मृत नवजात गाडलेल्या ठिकाणावरून गायब करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याबाबत कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा प्रकार अघोरी विद्या की प्रशासनाच्या ढिसाळ कारभारातून घडला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.अमोल सुरेश नागपूरकर (३०, रा. मोतीनगर) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. कुुटुंबात गर्भपात झाल्यानंतर २५ एप्रिल रोजी साडेचार महिन्यांचे मृत नवजात महाकाली मंदिरालगत असलेल्या दफनभूमीत अडीच फूट खोल खड्डा करून पुरण्यात आले होते.दरम्यान, हिंदू स्मशानभूमीतून अस्थिकलश गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकले. हिंदू स्मशानभूमीच्या एकंदर भोंगळ कारभाराची पोलखोल या वृत्तात ‘लोकमत’ने केले. त्यामुळे अमोल नागपूरकर यांनीही आपल्या नवजाताचा मृतदेह सुरक्षित आहे काय, याची खातरजमा करून घेण्यासाठी दफनभूमी गाठली. यावेळी त्यांनी पुरलेल्या नवजाताचा खड्डा संपूर्ण उखरल्याचे व खड्ड्यातील मृतदेह गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.काळजाच्या तुकड्याची अशी अवहेलना झाल्याने अमोल नागपूरकर यांनी तात्काळ हिंदू स्मशानभूमी प्रशासनाशी संपर्क साधून आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. मात्र, ही हद्द राजापेठ ठाण्याची असल्याने त्यांना माहिती देण्यात आली. राजापेठ ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अमोल नागपूरकर हे तक्रार देण्यासाठी ठाण्यात दाखल झाले; मात्र वृत्त लिहिस्तोवर तक्रार देण्यात आली नव्हती. या घटनेची चर्चा शहरात वाºयासारखी पसरली.मागील बाजू खुलीदफनभूमीची मागील बाजू मात्र पूर्णत: खुली आहे. या सुरक्षा भिंतीचे भिजत घोंगडे कायम आहे. हिंदू स्मशान संस्थेकडून ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून हात वर करण्यात आले आहे.  दरमहा ५० दफनविधीगणेश कॉलनीमागील या दफनभूमीत दरमहा ५० च्या जवळपास दफनविधी होतात. एप्रिल ते आतापर्यंत ४९ दफनविधी झाल्याची माहिती पुढे आली आहे.‘तो’ अस्थिकलश अद्यापही बेपत्ता!मसानगंज येथील रहिवासी विजय नारायणदास राय (६२) यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत २८ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आला. ३० एप्रिल रोजी तिसºया दिवसानिमित्त नातेवाइकांनी स्मशानभूमीत विधिवत पूजन केले व अस्थी गोळा करून कलश ठेवला. तो अस्थिकलश तेव्हापासून बेपत्ता आहे. यासंदर्भात २ मे रोजी मृताचे बंधू राजू राय यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली होती. स्मशानभूमीतून अस्थिकलशाची विक्री केली जात असून, गुप्तधन वा अघोरी पूजेसाठी त्याचा वापर केला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. स्माशानभूमीत कार्यरत भुºया नामक कर्मचाºयाकडून त्यांना यासंदर्भाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.प्रेतास सुरक्षितरीत्या दफन करण्याची जबाबदारी नातेवाइकांची आहे. जोपर्यंत महापालिकेकडून भिंत तयार होत नाही, तोपर्यंत दफन केलेल्या जागेवर त्यांनी रीतसर परवानगी घेऊन ओटा बांधावा.- राजेश हेडा, कोषाध्यक्ष, हिंदू स्मशान संस्था, अमरावती.

टॅग्स :Policeपोलिस