शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने दुमदुमले वरूड

By admin | Updated: November 30, 2015 00:33 IST

शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो.

नामवंत साहित्यिकांची मांदियाळी : भांडवलदार, राजकारणी, धर्मांधशक्तीची अभद्र युतीवरूड : शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो. हे त्यांचे विचारसूत्र होते. अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. असे महात्मा जोतिबा फुले आवर्जून सांगत होते. ज्ञानानेच आत्मस्थिती व समाजस्थिती येते हे या गुरू-शिष्याने निक्षून सांगितले आहे. बदलत्या काळात भांडवलदार, राजकारणी आणि धर्मांधशक्ती यांची अभद्र युती झालेली दिसते. समाजमन गढूळ झाले आहे. जाती जाती, धर्माधर्मात विष पेरल्या जात आहे. हाच खरा लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याने बदलत्या काळात हे चित्र बदलण्याची देशाला गरज असल्याने सत्यशोधक विचारांची गरज असल्याने शनिवारी वरुडमध्ये सहावे सत्यशोधक साहित्य संमेलन सुरु झाले. या निमीत्ताने शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.साहित्य समेंलन काठीवाले सभागृहात सुरू आहे. या परिसराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले परिसर असे नाव देण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. स्थानिक महात्मा फुले पुतळयाला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सामाजिक चळवळीतील सेवाभावी संस्था, प्रतिष्ठीत नागरिक तसेच आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात येऊन ग्रांथदिंडीला सुरुवात झाली. काठीवाले सभागृहात आयोजित साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत भाऊ लोखंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीष कराळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, श्रीकृष्ण बनसोड, महात्मा फुले महादिव्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे, माजी पोलीस उपायुक्त धनराज वंजारी, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षा सरिता खेरडे, ठाणेदार अर्जुन ठोसरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कळमकर, वासुदेव लांडगे, साहित्यिक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ मनोहर आंडे यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.संमेलनाचे उद्घाटक आ. अनिल बोंडे यांनी भाऊसाहेब लोखंडे यांना हे संमेलन आहे राजकीय स्टेज नसलेल्यांचे, असे सांगून शाब्दिक बोलाचाल झाली. यावेळी विषयाला कलाटणी देत भाउसाहेब लोखंडे यांनी विषय सावरुन नेला. यांनी वरुडमध्ये पहिल्यांदा ६ वे सत्यशोधक साहित्य संमेलन होत असून अनेकांना संमेलनाची आतुरता लागली आहे. नामवंत साहित्यिक, विचारवंत शहरामध्ये दाखल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)