शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने दुमदुमले वरूड

By admin | Updated: November 30, 2015 00:33 IST

शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो.

नामवंत साहित्यिकांची मांदियाळी : भांडवलदार, राजकारणी, धर्मांधशक्तीची अभद्र युतीवरूड : शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो. हे त्यांचे विचारसूत्र होते. अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. असे महात्मा जोतिबा फुले आवर्जून सांगत होते. ज्ञानानेच आत्मस्थिती व समाजस्थिती येते हे या गुरू-शिष्याने निक्षून सांगितले आहे. बदलत्या काळात भांडवलदार, राजकारणी आणि धर्मांधशक्ती यांची अभद्र युती झालेली दिसते. समाजमन गढूळ झाले आहे. जाती जाती, धर्माधर्मात विष पेरल्या जात आहे. हाच खरा लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याने बदलत्या काळात हे चित्र बदलण्याची देशाला गरज असल्याने सत्यशोधक विचारांची गरज असल्याने शनिवारी वरुडमध्ये सहावे सत्यशोधक साहित्य संमेलन सुरु झाले. या निमीत्ताने शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.साहित्य समेंलन काठीवाले सभागृहात सुरू आहे. या परिसराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले परिसर असे नाव देण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. स्थानिक महात्मा फुले पुतळयाला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सामाजिक चळवळीतील सेवाभावी संस्था, प्रतिष्ठीत नागरिक तसेच आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात येऊन ग्रांथदिंडीला सुरुवात झाली. काठीवाले सभागृहात आयोजित साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत भाऊ लोखंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीष कराळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, श्रीकृष्ण बनसोड, महात्मा फुले महादिव्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे, माजी पोलीस उपायुक्त धनराज वंजारी, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षा सरिता खेरडे, ठाणेदार अर्जुन ठोसरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कळमकर, वासुदेव लांडगे, साहित्यिक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ मनोहर आंडे यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.संमेलनाचे उद्घाटक आ. अनिल बोंडे यांनी भाऊसाहेब लोखंडे यांना हे संमेलन आहे राजकीय स्टेज नसलेल्यांचे, असे सांगून शाब्दिक बोलाचाल झाली. यावेळी विषयाला कलाटणी देत भाउसाहेब लोखंडे यांनी विषय सावरुन नेला. यांनी वरुडमध्ये पहिल्यांदा ६ वे सत्यशोधक साहित्य संमेलन होत असून अनेकांना संमेलनाची आतुरता लागली आहे. नामवंत साहित्यिक, विचारवंत शहरामध्ये दाखल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)