शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोराळ्याच्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

By admin | Updated: July 8, 2015 00:30 IST

तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे.

अन्याय : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्रचांदूरबाजार : तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे. या रोहित्रावर मर्यादेपेक्षा अधिक वीज जोडण्या दिल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा होत नाही. या अतिरिक्त जोडण्या देण्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ‘मलिदा’ लाटल्याचाही आरोप या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. गेल्या दोन वर्षापासून सदर १४ शेतकरी या रोहित्रावरील जोडण्या कमी करून नवीन रोहीत्र देण्याची मागणी करीत आहेत. मात्र सन २०१३ मध्ये नवीन रोहीत्र मंजूर होऊनसुद्धा वितरण कंपनीने नवीन रोहीत्र तर बसविले नाही व जुन्या रोहित्रावरील अतिरिक्त जोडण्या कमी केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी एकाही शेतकऱ्यांचे ओलीत होऊ शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर ‘मानवनिर्मित दुष्काळ’ ओढवला गेला. अद्यापही जुन्या रोहित्रावरील जोडण्या कमी करण्यात आल्या नाही व नवीन रोहीत्रही बसविण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा मानवनिर्मित दुष्काळ ओढवण्याची भीती या १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. रोहित्रावरील अमर्याद जोडण्या व नवीन रोहीत्र बसविले नसल्यामुळे बोराळा येथील १८ शेतकऱ्यांचे सुमारे १२५ एकरांवरील सिंचन रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)विनंती अर्ज विद्युत कार्यालयात पडूनतालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीजपुरवठा देण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केलेले विनंती अर्ज धूळ खात पडून आहेत. परिणामी शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत.