शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

राष्ट्रीय महामार्गावरील गावांमध्ये प्रवासी निवारा, पथदिवे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील परतवाडा ते अकोट ५४८-सी राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी, सातेगाव, चौसाळा, हसनापूर, अडगाव, भंडारज, तुरखेड ...

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील परतवाडा ते अकोट ५४८-सी राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी, सातेगाव, चौसाळा, हसनापूर, अडगाव, भंडारज, तुरखेड आदी गावांना परिसरातील गावे जुळलेली आहेत. अद्याप या गावांच्या थांब्यावर प्रवासी निवारा व पथदिवे बसविण्यात आलेले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाच्या दिवसात प्रवाशांनी वाहनाच्या प्रतीक्षेत कुठे थांबायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

गावाच्या थांब्यावर पथदिवे नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता प्रवासी निवारा व पथदिवे आदी गावांमध्ये उभारावे, याकरिता सहा महिने आधी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग (अकोला) कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु, अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गुरुवारी पुन्हा तहसीलदारांना परतवाडा ते अकोट राष्ट्रीय महामार्गावरील अंजनगाव सुर्जी तालुक्यातून येणाऱ्या सर्व गावांतील थांब्यावर १५ दिवसांत प्रवासी निवारा व पथदिवे न बसविल्यास राष्ट्रवादी युवक अन्यत्याग आंदोलन करेल, असे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कार्याध्यक्ष संदीप खेडकर, उपाध्यक्ष कल्याण गायगोले व शुभम ठाकरे, पुरुषोत्तम ढोले, किरण साबळे, संतोष पोटे, संकेत घोगरे, गोकूळ पडोळे, सार्थक जानोरकार, शुभम बहिरे, सत्यम काळे, सक्षम खलोकार, गौरव वक्ते, योगेश गिते, अनिकेत मसाने, कुलदीपक येवतकार, रुत्विक वैराळे, मोहन घोरमोडे आदी उपस्थित होते.