शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

बसपाची मते ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST

मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपचे अनिल बोडे, काँगे्रसचे नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर, बसपाच्या मृदुला पाटील, मनसेचे संजय देशमुख ही मंडळी निवडणूक प्रचारात आघाडीवर होती. नामांकनानंतर शिवसेनेच्या उमेश यावलकर यांच्या बाजूने माळी समाजाच्या गठ्ठा मतांचे ध्रुविकरण होईल, शिवाय पक्षाची मतेही त्यांना मिळतील, असे चित्र होते. परंतु माळी समाजाच्या मतांमध्ये खिंडार पडल्याने स्थिती पालटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप उमेदवाराला अव्हेरुन अनेकांनी शिवसेनेची कास धरल्याने उमेश यावलकर यांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे आणि राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांचे मतदारसंघात कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसते. २००९ च्या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे यांना ३७,८७० तर राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांना ३७,७४८ मते मिळाली होती. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. २००९ च्या निवडणुकीत मोर्शीचे अशोक रोडे बसपाकडून निवडणूक लढले. त्यावेळी त्यांना १८,३२५ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. परंतु त्यांना यापूर्वी मिळालेली मते भाजपाकडे म्हणजे बोंडेंकडे पूर्णपणे वळती झाली नाहीत. त्यातील बरीच मते काँग्रेस आणि राका उमेदवारांना शिवाय बसपाच्या कॅडरची मते बसपा उमेदवार मृदुला पाटील यांना मिळाल्याचे चित्र आहे. परिणामी राकाँचे हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.सध्याचे भाजप उमेदवार अनिल बोंडे २००९ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. २००४ ची निवडणूक युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांनी कायम ठेवलेल्या जनसंपर्काचा लाभ २००९ च्या निवडणुकीत त्यांना मिळाला. यंदा त्यांना भाजपाच्या मतांसोबतच त्यांच्या विदर्भ जनसंग्रामची मतेही उपयोगी पडतात काय? हे पाहणे रंजक ठरेल. मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते चौकाचौकांत निवडणूक निकालाविषयी अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)