शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बसपाची मते ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST

मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपचे अनिल बोडे, काँगे्रसचे नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर, बसपाच्या मृदुला पाटील, मनसेचे संजय देशमुख ही मंडळी निवडणूक प्रचारात आघाडीवर होती. नामांकनानंतर शिवसेनेच्या उमेश यावलकर यांच्या बाजूने माळी समाजाच्या गठ्ठा मतांचे ध्रुविकरण होईल, शिवाय पक्षाची मतेही त्यांना मिळतील, असे चित्र होते. परंतु माळी समाजाच्या मतांमध्ये खिंडार पडल्याने स्थिती पालटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप उमेदवाराला अव्हेरुन अनेकांनी शिवसेनेची कास धरल्याने उमेश यावलकर यांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे आणि राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांचे मतदारसंघात कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसते. २००९ च्या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे यांना ३७,८७० तर राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांना ३७,७४८ मते मिळाली होती. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. २००९ च्या निवडणुकीत मोर्शीचे अशोक रोडे बसपाकडून निवडणूक लढले. त्यावेळी त्यांना १८,३२५ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. परंतु त्यांना यापूर्वी मिळालेली मते भाजपाकडे म्हणजे बोंडेंकडे पूर्णपणे वळती झाली नाहीत. त्यातील बरीच मते काँग्रेस आणि राका उमेदवारांना शिवाय बसपाच्या कॅडरची मते बसपा उमेदवार मृदुला पाटील यांना मिळाल्याचे चित्र आहे. परिणामी राकाँचे हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.सध्याचे भाजप उमेदवार अनिल बोंडे २००९ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. २००४ ची निवडणूक युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांनी कायम ठेवलेल्या जनसंपर्काचा लाभ २००९ च्या निवडणुकीत त्यांना मिळाला. यंदा त्यांना भाजपाच्या मतांसोबतच त्यांच्या विदर्भ जनसंग्रामची मतेही उपयोगी पडतात काय? हे पाहणे रंजक ठरेल. मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते चौकाचौकांत निवडणूक निकालाविषयी अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)