शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खोदकामात बीएसएनएलचे केबल तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:50 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही ...

ठळक मुद्देनागरिकांचे दूरध्वनी बंद : कारवाईची अपेक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही या वेळी उपस्थित होत आहे.पेव्हर जाताहेत चोरीलाबीएसएनएलचे केबल गुरुवारी खोदकामादरम्यान तुटल्यानंतरही विभागाने मजीप्रावर कुठलीही कारवाई केली नाही. मजीप्राने नवीन पाइप लाइन टाकताना जुने पाइप काढले नाही. कारण त्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करावा लागणार आहे. खोदकाम अतिरिक्त खोल करण्यात येत असल्याने इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे.पाइप लाइन टाकण्याचे कंत्राट नाशिक येथील एका कंत्राटदाराला मिळाले आहे. हे काम होत असताना मनपा किंवा मजीप्राचा कुठलाही अभियंता या ठिकाणी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, काढलेले पेव्हर चोरीला गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात मजीप्रा कार्यकारी अभियंता कोपुलवार यांच्याशी संपर्क साधला; पण होऊ शकला नाही.अमृत योजनेच्या ११४ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामात गाडगेनगरातही शनिवारी काँक्रीट रस्ते फोडण्यात आले. येथे महिन्याभरापूर्वीच पेव्हर बसविण्यात आले होते.उपअभियंत्यांना पाठवून कामाची पाहणी करणाररस्त्याच्या मधोमध खोदून पाइप लाइन टाकणे हे नियमबाह्य आहे. यासंदर्भात मनपाच्या उपअभियंत्याना पाठवून कामाची पाहणी करणार असल्याचे मत अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेत मजीप्रा अधिकाºयांची एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ब्रेकिंग मशीनचा आवाज झाला बंदशनिवारी या परिसरात खोदकाम करण्याचे काम कंत्राटदारांनी बंद ठेवल्याची माहिती या प्रभागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे ब्रेकिंग मशीनच्या कर्कश्श आवाजापासून नागरिकांना काही प्रमाणात सुटका मिळाली आहे.मधोमध रस्ता फोडून कसे काय काम करण्यात येत आहे, हे मलाही समजले नाही. याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल.- जीवन सदार,अतिरिक्त शहर अभियंताअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ... : सदर कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिकेशी करार केला आहे. त्यानुसार मजीप्राला तातडीने पूर्ववत करून द्यावा लागणार आहे. परंतु, या ठिकाणी पाइप लाइन टाकल्यानंतर खोदकाम महिन्याभरापासून पूर्ववत करण्यात आलेले नाही व रस्तेही समतल करण्यात आले नाहीत. या ठिकाणी पसरलेली माती उचलून घ्यावी व फोडण्यात आलेले पेव्हर पूर्ववत करावे, अशी मागणी विनायकनगरातील नागरिकांनी केली आहे.