शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे अनुदान काढणारे दलाल सक्रिय

By admin | Updated: May 17, 2014 23:14 IST

निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

चांदूरबाजार : निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या  नियोजनामुळे या योजना  लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. लाभार्थ्यांंना थेट अनुदान मिळावे म्हणून शासनाने  निराधार योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले. आता निरक्षर व निराधार  वृध्दांना त्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेतून काढून देण्यासाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बँक  परिसरात  यासाठी दलाल सक्रिय झाल्याचे चित्र आहे.  
यावर आळा घालण्यासाठी प्रशासन अथवा बँक प्रशासनातर्फे अद्यापपर्यंंत पावले उचलल्या न गेल्यामुळे लाभार्थी  नाडवला जात आहे. शासनामार्फत महिला, वृध्द, निराधार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासारख्या अनेक  योजनांच्या माध्यमातून वृद्ध व निराधारांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. ही मदत दर दोन किंवा तीन  महिन्यांनंतर संबंधित लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात महसूल प्रशासनामार्फत जमा केली जाते. एका लाभार्थ्यांंला दर तीन  महिन्यांनंतर ६00 ते १२00 रुपये प्राप्त होतात. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थी शेकडोंच्या संख्येत बँकेत  जातात. यात बहुतेक लाभार्थी वृध्द व निरक्षर असतात. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन बँक परिसरात दलाल  सक्रिय झाले आहे. या मोबदल्यात हे दलाल संबंधित लाभार्थ्यांंकडून १0 ते ५0 रुपयांपर्यंंत रक्कम उकळतात.  इतकेच नव्हे तर पैसे देण्यास नकार देणार्‍या लाभार्थ्यांंना पैसे मिळविण्यात अडचणी आणतात. अनुदान बंद  होण्याची भीती दाखवितात. त्यामुळे नाईलाजाने का होईना लाभार्थ्यांंना नाहक भुर्दंंड सहन करावा लागत आहे.
 राष्ट्रीयीकृत बँका तालुकास्थळी असल्याने येथे शिरजगाव बंड, जैनपूर, जवळा, आखतवाडा, वडाळा, हैदतपूर,  जसापूर, कुरळ सोनोरी, नानोरी, खराळा,खरवाडी आदी गावखेड्यातील विविध अनुदान योजनेचे वृध्द व निराधार  लाभार्थी येथे येतात. त्यांना ४0 ते ५0 रुपये प्रवास भाडे द्यावा लागतो. बँकेत पैसे मिळण्यासाठी अख्खा दिवस  जातो. काहींना विलंबाअभावी रिकाम्या हाती परतावे लागले. 
इतकेच नव्हे तर बँकेतही वशिलेबाजीचा सामना लाभार्थ्यांंना करावा लागतो. तसेच बँकेतही या लाभार्थ्यांंना कुणाची  मदत मिळत नसल्याने दलालांचे सहकार्य घ्यावे लागत आहे. सहकार्य करायचे म्हटले की, दलालांना पैसे द्यावेच  लागतात. त्यामुळे मिळालेल्या अनुदानालाही कात्री लागते याची दखल कोण घेणे गरजेचे आहे. (तालुका  प्रतिनिधी)