शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एक दिवा त्यांच्या दारी, मिळो जगण्याला उभारी

By admin | Updated: October 22, 2014 23:10 IST

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा दिवाळी सण उत्साहात गुरुवारी साजरा केला जाणार आहे. निवडणुकीचा पोळा फुटताच झाले गेले विसरून प्रत्येक घरी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे.

पुढाकार घेण्याची गरज : वंचितांच्या वाट्याला येईल का रोषणाई?गजानन मोहोड - अमरावती‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा दिवाळी सण उत्साहात गुरुवारी साजरा केला जाणार आहे. निवडणुकीचा पोळा फुटताच झाले गेले विसरून प्रत्येक घरी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. परंतु असेही काही परिवार आहेत जिथे निरव शांतता आहे. शोषित, वंचितांच्या घरात दिवाळीची पणती पेटण्याचीही स्थिती नाही. गावकुसाबाहेरील पाल (प्लास्टिकच्या किंवा तुराटीची राहुटी) उभारुन राहणाऱ्या शेकडो झोपड्यांमध्ये, पालांमध्ये दिवाळीची एक पणतीही पेटण्याची स्थिती नाही. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत असणाऱ्या या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही. इतर लोक साजरी करतात ती दिवाळी पहायची, याला म्हणतात दिवाळी ही अनुभवाची अशी स्थिती आहे. या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश केव्हा पोहोचणार यासाठी समाजमन जागृत होण्याची गरज आहे. यासाठीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘वंचित’ अन् ‘उपेक्षांच्या गर्तेत’ हेलकावे घेणाऱ्या भटक्यांच्या हजारो पालांमध्ये, गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये गोडधोड तर दूरच; साधी पणतीही दोन दिवसांमध्ये पेटली नाही. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश स्वप्नवत आहे. अन् दिवाळीही होईल हसरीजिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या गावांच्या आधाराने जीवन जगणाऱ्या व पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या फिरत्यांच्या परिवारात दिवाळीचा प्रकाश पोहोचणे सुतरामही शक्यता नाही. भटक्यांसाठी दिवाळी येते आणि जाते. ती कधीच साजरी केली नाही. नवीन कपडे तर दूरच अंगभर कपडेही घालायला मिळत नाही. चटणी-भाकर हेच मिष्ठान्न त्यांना गोड मानून समाधान मानावे लागते. अभ्यंगस्रान, औक्षण, गोडधोड अन् रूचकर फराळ फार लांबची गोष्ट. समाजाची अशी विपरीत परिस्थिती आजची आहे. एकीकडे लख्ख प्रकाशाच्या दीपमाळा तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार अशा विरोधाभासात जिल्ह्यातील अनेक गावांत दिवाळी साजरी होत आहे. यासाठी मनाचा एक कोपरा व वंचितांच्या तंबूपर्यंत प्रकाश पोहचविण्यात यशस्वी ठरला तरी खूप काही भरून पावल्यासारखे होईल.दिवाळीच्या सणाची प्रतीक्षा लहान-थोरांपासून सर्वांनाच असते. दिवाळी जसजशी जवळ येते तसतशी नवनवीन वस्तू खरेदी, कामाची लगबग घराच्या साफसफाईपासून रंगरंगोटीपर्यंत तयारीला सुरूवात होते. परंतु ज्यांना घर नाही, जे रस्त्याच्या कडेला राहतात किंवा गावकुसाबाहेरील पाल बांधून राहतात, त्यांचे काय? ज्यांच्यासाठी जमीन हे अंथरून अन् आकाश हे पांघरून असते तेथे पाल उभारून त्यात ते कसेतरी जीवन कंठतात. त्यांच्यासाठी दिवाळीचा दिवसही इतर दिवसांसारखा. अभ्यंगस्रान, सुगंधी उटणे, खूप दूरची गोष्ट. कित्येक दिवस अंगाला पाणी लागत नाही, हे वास्तव आहे. या वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजऋणाची उतराई म्हणून एका वंचिताच्या जीवनातील एक कोपरा जरी प्रकाशमान केला तरी कित्येकाच्या जीवनात आनंद फुलू शकेल, त्यांची दिवाळीदेखील हसरी होईल, प्रकाशमान होईल. या शोषित, वंचितांच्या जीवनातही दिवाळीचा प्रकाश येऊ शकेल. हजारो वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलू शकेल. यासाठी समाजातील प्रत्येक पांढरपेशाने आपल्या मनाचा एक बंद कोपरा खुला करायला हवा. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी नवीन कपडे घेताना एखादा ड्रेस घेता येऊ शकतो, मुलांसाठी फटाक्याची खरेदी करताना त्यातील चारदोन फटाके वेगळे काढता येऊ शकतात. गोडधोड पदार्थापैकी त्यांच्यासाठी नक्कीच वेगळे काढता येऊ शकते. आपल्या घरात दिव्यांची आरास रचताना, रोषणाई करताना त्या पालाच्या तोंडाशी चार दोन पणत्या नक्की आणि निश्चितच लावता येऊ शकतात. सामाजिक बांधिलकीची भावना विविध संस्था, संघटना, संवेदनशील आणि दानशूर व्यक्तींना हे सहज शक्य होऊ शकते अन् शोषित, वंचित, पीडितांच्या पालात दिवाळीचा प्रकाश येऊ शकतो, असे झाल्यास हीच समाजऋणाची खरी उतराई होईल.