शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मेळघाटात उज्ज्वल पहाट! तीन वर्षात कुपोषण घटल्याची प्रशासनाची स्पष्टोक्ती

By जितेंद्र दखने | Updated: June 16, 2023 19:31 IST

मागील तीन वर्षात मेळघाटातील कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून, यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे याचा फायदा होत आहे.

अमरावती : मागील तीन वर्षात मेळघाटातील कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून, यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे याचा फायदा होत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४५६ होती ती आता २३५ वर आलेली आहे. त्याचबरोबर गृहप्रसूतीचे प्रमाण १६ वरून ६ टक्क्यांवर आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

मेळघाटामध्ये विविध कारणांमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे हे जरी सत्य असेल तरी मागील तीन वर्षांपासून महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग आपल्या स्तरावर विविध योजना, उपक्रम, अभियान राबवून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीईओ अविश्यांत पंडा यांनी गतवर्षी सुरू केलेले मिशन २८ या अंतर्गत नवजात बालके आणि गरोदर स्त्रिया यांच्या घरी अंगणवाडीसेविका आणि आशावर्कर दररोज भेटी देत आहेत. आजारी बालके आणि जोखमींच्या माता याबाबत तात्काळ वरिष्ठांना पुरविली जात आहे. त्यामुळे कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यामध्ये आणि गृहप्रसूतीचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश आले आहे.

यावर्षी पेसाचा निधी वापरून चार हजार कमी वजनांच्या बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू केले आहेत. कमी वजनांची बालके तीव्र कुपोषित होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी आहे. महाराष्ट्रातील अमरावती हा केवळ एकमेव जिल्हा आहे, जो अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहे. ज्या बालकात ग्राम बालविकास केंद्रात ठेवूनही सुधारणा होत नाही, अशा बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बाल उपचार केंद्रात दाखल केले जात आहे. यासाठी लागणारा निधी ॲडव्हान्स म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याबाबत आदेश सीईओंनी दिले आहेत.

ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त बालकांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर बाल उपचार केंद्राला ॲडव्हान्स निधी दिला असून, तिथेसुद्धा बालकांवर उपचार केले जात आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न आहे. - अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती 

टॅग्स :Amravatiअमरावती