शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सलग सुट्यांमुळे बोंडअळीचे पंचनामे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:34 IST

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी,....

ठळक मुद्दे१४ डिसेंबर होती ‘डेडलाईन’ : अद्याप ७० टक्क्यांवरच रखडले काम

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला देऊन एका आठवड्यात अहवाल मागितला. मात्र, या मुदतीला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सलग तीन सुट्यांमुळे पंचनाम्याचे काम बाधित झाल्याचा आरोप होत आहे.यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दोन लाख ८ हजार क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र आहे. पेरणी काळात अल्प पावसामुळे शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. यातून जी कपाशी बचावली तिच्यावर आॅक्टोबर महिण्यात पात्या फुलांवर असताना गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. यामध्ये जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी पीक बाधित झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविला. शेतकऱ्यांना केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने ७ डिसेंबरला पंचनाम्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्याचे आदेश देऊन दोन दिवसांत अहवाल मागितला. आता दोन आठवडे झाले असतानाही पंचनामा व अहवाल तयार झालेला नाही. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळेच यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दीड लाख हेक्टरवर क्षेत्रात प्रादुर्भावकृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर बोंडअळीने बाधित झाल्याचा अहवाल शासनाला दिला. प्रत्यक्षात दीड लाख हेक्टरवरील कपाशी बाधित असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत पंचनाम्यांचे काम ७० टक्क्यांवरच झाले असल्याची माहिती आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्व तालुक्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.-अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी