शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सलग सुट्यांमुळे बोंडअळीचे पंचनामे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:34 IST

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी,....

ठळक मुद्दे१४ डिसेंबर होती ‘डेडलाईन’ : अद्याप ७० टक्क्यांवरच रखडले काम

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला देऊन एका आठवड्यात अहवाल मागितला. मात्र, या मुदतीला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सलग तीन सुट्यांमुळे पंचनाम्याचे काम बाधित झाल्याचा आरोप होत आहे.यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दोन लाख ८ हजार क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र आहे. पेरणी काळात अल्प पावसामुळे शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. यातून जी कपाशी बचावली तिच्यावर आॅक्टोबर महिण्यात पात्या फुलांवर असताना गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. यामध्ये जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी पीक बाधित झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविला. शेतकऱ्यांना केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने ७ डिसेंबरला पंचनाम्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्याचे आदेश देऊन दोन दिवसांत अहवाल मागितला. आता दोन आठवडे झाले असतानाही पंचनामा व अहवाल तयार झालेला नाही. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळेच यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दीड लाख हेक्टरवर क्षेत्रात प्रादुर्भावकृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर बोंडअळीने बाधित झाल्याचा अहवाल शासनाला दिला. प्रत्यक्षात दीड लाख हेक्टरवरील कपाशी बाधित असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत पंचनाम्यांचे काम ७० टक्क्यांवरच झाले असल्याची माहिती आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्व तालुक्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.-अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी